Saturday, 29 November 2025

*वरणगाव येथे या मंगळवारी आठवडे बाजार नाही.जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी* *आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

*वरणगाव येथे या मंगळवारी  आठवडे बाजार नाही.जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी* 
*आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी* 


*जळगाव, दि. 28 नोव्हेंबर (इंडिया 365 न्यूज) :–* नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला असून आदर्श आचारसंहिताही त्याच दिवसापासून लागू आहे. निवडणुकीचे मतदान मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मंगळवार व बुधवार या दिवशी अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नये म्हणुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँण्ड फेअर्स अॅक्ट 1862 च्या कलम 5 (अ) व (क) मधील अधिकारांचा वापर करून महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. 

त्यानुसार 02 डिसेंबर 2025 (मतदानाचा दिवस) आणि 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) या दोन्ही दिवशी जळगाव जिल्ह्यातील नगर पालिका हद्दींमध्ये भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात येतील.तसेच नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Tuesday, 18 November 2025

*जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भाजपा ची बिनविरोध बोहनी*

*जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात कमळ फुलण्यास सुरुवात...*

नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या पत्नी सौ.उज्वला दीपक तायडे यांची प्रभाग क्रमांक ११ ब मधून बिनविरोध निवड झाली.


जामनेर नगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ.उज्वला दीपक तायडे यांचा विरोधातील उमेदवार यांचा अर्ज छाननी मध्ये फॉर्म बाद करण्यात आला. त्यामुळे उज्वला दीपक तायडे ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ह्या निवडीमुळे जामनेर शहरात भाजपाचे कमळ फुलण्यास सुरुवात झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीचे ना . गिरीषभाऊ महाजन, नगराध्यक्ष साधना ताई महाजन, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व भाजप पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Wednesday, 5 November 2025

*सर्वात मोठा "पंच"....*


*विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे  प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती* 

*जळगाव दि.५ प्रतिनिधी* -  जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत  विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन  दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा होईल. या जागतिक बुद्धिबळपटूंसाठी आकर्षण केंद्र असलेल्या स्पर्धेत जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांना (सामना पंच) सहाय्यक पंच म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) यांनी केली आहे. प्रवीण ठाकरे यांनी यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. विश्वचषक स्पर्धेत असा बहुमान मिळवणारे उत्तर महाराष्ट्रातील प्रविण ठाकरे पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ संघाचे सल्लागार तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विशेष कौतूक करून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, नरेंद्र फिरोदिया, विनय बेले, पी. बी. भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ महासंग्रामात ८० पेक्षा जास्त देशांचा सहभाग असून, २०६ खेळाडू अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या गटातील या स्पर्धेत बाद फेरीचा अवलंब केला जात असल्याने अतिशय उत्कंठावर्धक व रोमहर्षक सामने अनुभवण्याची संधी बुद्धिबळ प्रेमींना लाभत असते. भारताकडून डी गुकेश, प्रग्नानंदा, अर्जुन इरिगेसी, विदित गुजराथी, अरविंद चिदंबरम,  दिव्या देशमुख सारखे कसलेले खेळाडू सहभागी होत असून जगभरातून अनिश गिरी, वेस्ली सो, नोदरबेक अब्दुसत्तारोव,इयान नेपोमियाशी, व्हिन्सेंट केमर, लियोन आरोनियन यांसारखे दिग्गज व अनुभवी खेळाडू  देखील या स्पर्धेत आपले कसब पणाला लावतील.

जगातील सर्वोत्तम २०६ बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व नियुक्त केलेले पंच या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व गोवा शासनाने केली आहे. या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्तीस हा बहुमान प्राप्त व्हावा, ही महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेमींसाठी खचितच अभिमानास्पद बाब आहे.  
या त्यांच्या यशासाठी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*फोटो कॅप्शन* -  प्रविण ठाकरे यांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्त झाल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना अशोक जैन, अतुल जैन.