Tuesday, 1 February 2022

बजेट-संमिश्र प्रतिक्रिया

बजट संदर्भात विविध प्रतिक्रिया ...
1) माजी खासदारडॉ उल्हास पाटिल
2) गिरिश महाजन,माजी मंत्री
3) अशोक भाऊ जैन


घोषणाबाज अर्थसंकल्प 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा निव्वळ घोषणाबाज असल्याचा भासत आहे. सहकार, शेती क्षेत्र, आरोग्य, गुंतवणूक यासारख्या महत्वाच्या बाबींसंदर्भात भरीव तरतुदीची अपेक्षा होती. ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत त्या प्रत्यक्षात कशा अंमलात आणल्या जातील याविषयीचे ठोस नियोजन दिसत नाही. आरोग्य क्षेत्र डिजीटल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली असली तरी त्याची व्याप्ती आणि स्वरूप कसे राहील हे स्वप्नरंजनच आहे. कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रात कमालीचे बदल झाले आहेत. त्यादृष्टीने आरोग्यासाठी भरीव तरतूद करणे आवश्यक होते. कररचनेत कुठलाही बदल न झाल्याने सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. यापुर्वीच मोदी सरकारने २ कोटी रोजगाराची घोषणा केली होती. ती अद्याप पूर्ण झाली नाही. तोच आता नव्याने ६० लाख रोजगारांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. २०४७ च्या विकासाची ब्लु प्रिंट म्हणून घोषित झालेला हा अर्थसंकल्प केवळ घोषणाबाजच असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.

गिरिश भाऊ महाजन:-

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी | केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कोविडच्या आपत्तीतही शेतकर्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा असून यातून देशाचा चौफेर विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे आ. गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले की, सध्या देशावर कोविडच्या आपत्तीचे संकट असतांनाही शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत.

यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे केंद्र सरकारने कडधान्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले असून याचे मूल्य शेतकर्यांना थेट आपल्या खात्यामध्ये मिळणार आहेत. रासायनिक खतांनी मुक्त असणार्या शेतीला यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये आता नैसर्गिक शेती, झीरो बजेट शेती आदी विषयांचा समावेश करण्यात येणार असल्याची बाब अतिशय महत्वाची अशीच आहे. अर्थमंत्र्यांनी किसान ड्रोनच्या माध्यमातून आधुनीक शेतीसाठीची तरतूद देखील केलेली आहे. शेतीसोबत यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगारालाही प्राधान्य देण्यात आले असून वर्षभरात ६० लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. तर लहान व मध्यम व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी देखील अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आधीच आत्मनिर्भर भारताचे व्हिजन मांडले असून निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात याचे प्रतिबिंब उमटल्याचे आ. गिरीशभाऊ महाजन यांनी नमूद केले आहे. यात अर्थव्यवस्थेची प्रगती ही समाधानकारक राहणार असून यंदा झालेले विक्रमी जीएसटी संकलन हे याचेच प्रतीक आहे.

आ. महाजन पुढे म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे.  महाराष्ट्राच्या वाटेलाही यात भरीव तरतुद करण्यात आलेली आहे. यात नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरमुळे माल वाहतुकीची सुविधा होणार असून याचा स्थानिक शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांना लाभ होणार आहे.

आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, प्रथमच शेती करता बॉस सारख्या आधुनिक उपक्रमाचा वापरामध्ये प्रोत्साहन दिलं शिक्षण क्षेत्रात भरीव तरतुदी करून अंगणवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत जागतिक दर्जाच्या संस्थांना आमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण निर्मितीचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे.  साठ लाख नोकर्‍या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलं उद्योगांना तसंच कर न चुकविणार्‍या यांना जर रेड पडली तर त्यामध्ये जप्त असलेले सर्व साहित्य कायमस्वरूपी जप्तीचा मोठ्या निर्णयाचे स्वागत आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच डिजिटल यंत्र भरीव तरतूद करून याच्या वापराला प्रोत्साहन दिलं तसेच ८० हजार नवीन घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून निर्मितीचे उद्दिष्ट या यावेळी ठेवण्यात आले असून प्रगतीसाठी या बाबी पूरक असल्याचेही आमदार गिरीश महाजन यांनी नमूद केले आहे.

अशोक भाऊ जैन:-
*"हा तर डिजिटल अर्थसंकल्प"--अशोक भाऊ जैन यांची बजेट वर प्रतिक्रिया..*

*ड्रोन टेक्नोलॉजी मुळे एक कोटि शेतकऱ्यांचे लाभ शक्य...*

*पहा सविस्तर...."इंडिया365" वर.....*

अयाज़ मोहसिन 9273403088.

https://youtu.be/Ed1aVsjB_JQ




Tuesday, 11 January 2022

घुबडाला मिळाले नवजिवन,युवकांचे अभिनंदन

*पोरांचा पतंग खेळ रंगला अन अंधाऱ्या रात्री जीव झाडाले टांगला त्याले वाचवण्यासाठी पक्षीमित्र धावला* 
नागरिकांची सतर्कता , वन्यजीव चे पक्षीमित्र आणि मनपा प्रशासनाचे टीम वर्क घुबडाला दिले जीवदान 

सध्या पतंग बाजी चा खेळ जोर धरत आहे अनेक भागात चोरी छुपे नायलॉन मांजा वापरून पतंग उडवले जातात अनेक ठिकाणी ते मांजे झाडात गुंतून आहेत त्यात पक्षी फसून अडकतात आणि जीवाला मुकतात काही वाचवले जातात असाच एक प्रकार काल वाल्मिक नगरात घडला 
मध्यरात्री नायलॉन मांजात अडकलेल्या शृंगी घुबडाला सागर पहेलवान यांच्या सतर्कतेमुळे आणि मनपा प्रशासन वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षीमित्र यांच्या  टीम वर्क मुळे वाचवणे शक्य झाले 

वाल्मिक नगर भागातील सागर पहेलवान हे रेल्वे कर्मचारी वन्यजीवप्रेमी नागरिक आहेत त्यांचे घरा समोर पुरातन पिंपळ वृक्षावर गेल्या 7,8 वर्षा पासून एक शृंगी घुबड नेहमी बसलेले असते कधी उंदीर तर कधी इतर भक्ष घेऊन झाडावर बसलेले घुबड ते कुतूहलाने बघत असतात. 
 सोमवारी मध्यरात्री देखील त्यांनी घुबडाला शोधण्यासाठी झाडावर नजर लावली असता झाडावर फडफड जाणवली बारीक टॉर्च च्या प्रकाशात ते घुबड मांजात अडकून जगण्याचा संघर्ष करत असल्याचे दिसले त्यांनी तात्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांना कळवले की कोणत्याही परिस्थितीत हे घुबड वाचले पाहिजे आता वाचवले नाही तर सकाळ पर्यंत त्याचा जीव जाईल योगेश गालफाडे यांनी संस्थेचे पक्षीमित्र बाळकृष्ण देवरे यांच्याशी चर्चा करत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरम्यान मनपा अग्निशमन विभागात कॉल केला तिथे फायरमन देविदास सुरवाडे वसंत कोळी, परमेश्वर सोनवणे , यांनी फायर ऑफीसर शशिकांत बारी यांचे मार्गदर्शन घेत क्षणाचाही विलंब न करता सहमती दर्शवली पथक घटनास्थळी दाखल झाले आणि टीम वर्क रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. 

 जमिनी पासून 20 फुटावर हाय टेंशन लाईन त्याला समांतर वरती झाडावर सुमारे 40 फूट उंचीवर हे घुबड अडकलेलं होते . पिंपळाचे झाड पुरातन असल्याने बुंधा मोठा आणि सरळ  म्हणून चढताही येईना , 
खाली इलेक्ट्रिक तार असल्याने धोका देखील होता म्हणून मनपा विद्युत विभागाचे वाहन मिळवण्यासाठी त्या विभागाचे अभियंता एस एस पाटील यांना कॉल केला त्यांनी मध्य रात्र असून देखील प्रतिसाद दिला विद्युत वाहन चालक प्रशांत कंखरे देखील यायला तयार झाले. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कंट्रोल रूम गृप वर पोस्ट बघून vjss चे हरीश चौधरी, यश चौधरी , देखील पोचले
विद्युत वाहन यायला वेळ लागत असल्याने आणि सकाळ पर्यंत घुबड वाचण्याची शक्यता नव्हती म्हणून विविध कोनातून प्रयत्न करत ladder ( फायर फायटर ची शिडी ) उभे केले या साठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शिबिरात उपलब्ध संसाधनांचा वापर करत सुरक्षित रेस्क्यू चे प्रशिक्षण कामी आले 
दीड तास ladder सेट करण्यात गेला कारण हाय टेंशन तारेला स्पर्श व्हायला नको ( शक्य झाले नसते किंवा धोका जास्त असता तर मेन सप्लाय बंद करण्यासाठी परमिट घेण्याची तयारी करून ठेवली होती) 
अंधार असल्याने लांब बीम असलेल्या प्रखर टॉर्च ची आवश्यकता होती ती आमच्या जवळ नव्हती म्हणून अमन गुजर यांना कॉल केला ते 10 मिनिटात टॉर्च घेऊन पोचले 
विद्युत वाहन देखील दाखल झाले त्याने सुद्धा पक्षा पर्यंत पोचणे शक्य नव्हते म्हणून सेट केलेल्या ladder वर vjss चे पक्षीप्रेमी हरीश चौधरी ला 12 फुटाचा बांबू आकोडा लावून पाठवले तो कमी पडला म्हणून त्याला अजून एक 7 फुटाची बारीक काठी बांधली मग अलगद अंदाज घेत घुबडाला इजा होणार नाही आणि ते सरळ तारांवर देखील नको पडायला झाडात अडकले पाहिजे अश्या बेताने मांजा तोडला 4 ,5 वेळा प्रयत्न केल्यावर यश आले आणि घुबडाने भरारी घेत समोरच्या बिल्डिंग वर विसावा घेतला आणि उपस्थितांच्या तोंडून हे उदगार निघाले 
*पोरांचा पतंग खेळ जोरात रंगला अन अंधाऱ्या रात्री जीव झाडाले टांगला ...त्याले वाचवण्यासाठी पक्षीमित्र धावला*

Saturday, 13 November 2021

मुख्यमंत्री ठाकरे की सेहत के लिए नियाजे पाक--अजमेर दौरा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी जळगावच्या शिवसैनिकांची मन्नत

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळताच जळगावचे शिवसैनिक फरीद खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी
ख्वाजा मीया बाबांच्या दर्ग्यावर 11 किलो न्याज व 50 बांधवांना अजमेर येथील प्रसिद्ध बाबांच्या दर्ग्यावर स्वखर्चाने घेऊन जाण्याची मन्नत मागितली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका व मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती समोर आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील  शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याने जळगाव शहारतील गणेश कॉलनी परिसरातील ख्वाज्या मिया दर्ग्यावर न्याज वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात होता कार्यक्रमाची सूर्वात दर्गेवर फुलांची चादर  शिवसेनेचे उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, फरीद खान, फिरोज पिंजारी, जाकिर पठाण, यांच्या हस्ते करण्यात आले असून 21 नोव्हेंबर रोजी शिवसैनिक फरीद खान हे 50 शिवसैनिकांना अजमेर येथे घेऊन जाणार आहेत.

Friday, 27 August 2021

शिवसेना आंदोलना मूळे ,भाजपा कार्यालय शुद्धीकरण

भाजपा जळगाव तर्फ़े प्रकाशित प्रेस नोट:-

आज दिनांक २७/०८/२०२१ रोजी भाजपा महिला मोर्चा व अध्यात्मिक आघाडी जळगाव यांच्यातर्फे वसंत स्मृती कार्यालय जळगाव येथे शुद्धीकरणाचे कार्यक्रम संपन्न झाले असून दिनांक 24 तारखेला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालय येथे कोंबड्या वेगळ्या व हिंदूंचे पवित्र शब्द काढले व कार्यकर्त्यांना मारहाण करून अत्यंत खालच्या शब्दात घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांच्या वतीने उभा राहिलेल्या असे राजकीय वस्तू शुद्धीकरण अध्यात्मिक आघाडी यांच्यातर्फे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, यांच्या नेतृत्वात अध्यक्षा दिप्ती ताईचे, माड्या सरचिटणीस रेखाताई वर्मा, सरोज पाठक, जिल्हा पदाधिकारी रेखाताई कुलकर्णी, महिला आघाडीच्या पूजाताई चौधरी, तृप्ती पाटील, सरचिटणीस उदय परदेशी छायाताई ,सरस्वती मोरे, शर्वरी मोरे, ज्योती बर्गे, आदी महिला उपस्थित होत्या.

 यांच्यातर्फे कार्यालय येथे हवन करून शुद्धीकरण करण्यात आले या होणार जिल्हाध्यक्ष दीपक यांनी सिद्ध करणार होती कार्यक्रम या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र दिपक जी साखरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद मिलिंद चौधरी, व कार्यालय मंत्री सकाळची पंडित जिल्ह्यासह प्रसिद्धीप्रमुख योजना धिरज वर्मा, राहुल भाऊ वाघ, निलेश भाऊ झोप, या आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tuesday, 24 August 2021

कोरोना काळातही जैन इरिगेशन ने दिला रोजगार..

कोरोनाकाळातही जैन इरिगेशनने 

नवीन १०६० जणांना दिली कायमस्वरूपी नोकरीची संधी

जळगाव दि२४ प्रतिनिधी - दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झालाबहुतांश उद्योगांमध्ये कामगार यांना दीर्घ सुटी देण्यात आली किंवा कामगार कपात करावी लागली तर काहींनी वेतन कपात केलीअशाही स्थितीत जळगावमधील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमध्ये असे काहि न करता विविध कामांसाठी पदांवर नव्याने १०६० जणांना कायमस्वरूपी नोकरीची संधी देऊन सामावुन घेतले आहे.

जैन इरिगेशन आणि संलग्न उत्पादक कंपन्यांवर सध्या वित्त पुरवठा विस्कळीत झाल्याचे संकट आहेतरीही सामाजिक बांधिलकी ठेऊन नियमित सहकारी (कामगारशिवाय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेतसध्या जैन इरिगेशनच्या जळगाव स्थित आस्थापनामधे ६२५० कायमस्वरूपी सहकारी आहेत याशिवाय सरासरी २५०० ते ४५०० कंत्राटी कामगार गरजेनुसार सेवा पुरवित आहे.

मार्च २०२० पासून भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागलाजुलै २०२० पासून विषाणूच्या संसर्गाने बाधित रूग्ण संख्या सप्टेंबरपर्यंत लाखांच्यावर पोहचलीकेंद्र सरकारने सलग तीन वेळा लॉकडाऊन वाढवलेत्यामुळे उद्योगातील उत्पादन निर्मिती थांबलीकच्चामाल पुरवठा थांबलाजे उत्पादन तयार होते ते पोहचवले जात नव्हतेअशा स्थितीत आर्थिक अडचणी अजून वाढल्याहे सर्व अनुभवाला येत असतानासुद्धा जैन इरिगेशनच्या व्यवस्थापनाने महामारी व लॉकडाऊन काळात नियमित कामगाराचा रोजगार कमी करायचा नाही असा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला.

खाजगी संस्थाना लस विकत घेण्याची परवानगी मिळालेनंतर जैन इरिगेशनने कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करून सर्व सहकाऱ्यांना टोचणी करून घेतलीया लसीकरणाचा लाभ ४६०० कर्मचाऱ्यांनी घेतला आहेयाशिवाय कामावर येणाऱ्या सर्व सहकारी-कामगारांची लसीकरणाची व्यवस्था करून या सहकाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व तपासणी करण्यासाठी १० डॉक्टर तसेच १७ वैद्यकीय सहाय्यकांचे पथक रोज कार्यरत होते व आहेजैन इरिगेशन व्यवस्थापनाने वेळोवेळी सहकारी-कामगारांशी परिपत्रकांद्वारे संपर्क करून कोरोनाची लक्षणेप्रतिबंधात्मक उपायआजारपणात घ्यायची काळजीआजार बरा झाल्यानंतर पश्चात घ्यायची काळजी याविषयी कामगार व त्यांच्या कुटुंबात जागृती केली आणि करीत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव संपर्कातून होतो हे लक्षात घेऊन उत्पादन निर्मिती पाळ्यांमध्ये अर्धा तासाचे अंतर वाढविलेया काळात योग्य पद्धतीने कामाची जागा सॅनिटायझर केलीया शिवाय कामगारांमधील अंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार राखलेकंपनीच्या आवारात जेवणाची व्यवस्था बदललीबंदिस्त जागेतून खुल्याजागेत योग्य अंतरावर बसायची व्यवस्था केली आहेकाही कामगारांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आलीबाहेरगावाहून कंपनीत कामावर येणाऱ्यांसाठी आरोग्याची माहिती देणारे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होतेरोज कामावर येणार्‍या सहकार्‍यांची प्रवेशद्वारावर ऑक्सिमीटर व थर्मामीटरने वेळोवेळी तपासणी केली जातेतेथे साबणाने हात धुवून सॅनिटायझर फवारणीची व्यवस्था केली आहे.

कामगारांसाठी विशेष योजना

लॉकडाऊन काळात काही कामगारांचे येणे-जाणे सुरक्षित व्हावे यासाठी व्यक्तिगत दुचाकी वाहन खरेदी योजनेत कंपनीकडून ६० टक्के उचल दिली गेलीत्यात १४४ महिला तसेच २५५ पुरूष अशा एकूण ३९९ कामगारांनी लाभ घेतलाकंपनीमध्ये कोरोनाच्या तपासणी शिबिर घेऊन ५३६७ सहकारी-कामगारांची ॲन्टीजन टेस्ट करून घेतलीएवढी काळजी घेऊनही जे कामगार कोरोना संसर्गामुळे आजारी झाले त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी खास पथक आहेया पथकाचे नियंत्रण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्याकडे आहेया पथकाने वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्ला-मसलत केलीकामगारांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्यासंसर्ग बाधित कामगाराला दवाखान्यात बेड-गरजेनुसार ऑक्सिजनइतर उपकरणे उपलब्ध करून दिली यासह रूग्ण कामगार व कुटुंबाची भोजन व्यवस्था केली.

कामगारांच्या वारसांना रोजगार व शिष्यवृत्ती

कोरोना प्रकोपाच्या काळात योग्य काळजी घेऊनही दुर्दैवाने जैन उद्योग समुहातील काहि सहकाऱ्यांचा मृत्यू झालात्या कामगारांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत दिली गेली या सह त्या कामगारांच्या वारसाला त्याच्या शिक्षण व गुणवत्तेनुसार कायम स्वरुपाचा रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आलाशिक्षण घेत असलेल्या पाल्याच्या मूलभूत शिक्षणाचा खर्चही कंपनी उचलणार आहेकाही कामगाराचे पाल्यपत्नी हे कामावर रुजू ही झालेले आहेत.

कोट...

करोना काळात सर्वच उद्योगांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले याही परीस्थितीत जैन इरिगेशनने कामगार कपाती याऐवजी नव्याने १०६० लोकांना कायमस्वरूपी सामावून घेतले यासह त्यांचा सुरक्षिततेसाठी संपूर्ण लसिकरणदुचाकी वाहन योजनाआरोग्याची पुरेपुर काळजी घेत असल्याने कंपनी आपले उत्पादन नियमीत सुरू ठेऊ शकत आहे.

अतुल जैनसहव्यवस्थापकीय संचालकजैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड

Monday, 23 August 2021

जवान गोपालच्या कुटुंबाचे पालकमंत्रीनी केले सांत्व

जवान गोपाल सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सात्वंन
  जळगाव, (जिमाका) दि. 23 - ओडिशा येथे सीआयएसएफ मध्ये कार्यरत असलेले कुऱ्हाड, ता. पाचोरा येथील जवान गोपाल अरुण सुर्यवंशी यांचे नुकतेच निधन झाले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज कुऱ्हाड येथे जावून जवान गोपाल सुर्यंवशी यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन केले. 
  यावेळी पालकमंत्र्यांनी जवान अरुण सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे यावेळी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्र्यांसोबत आमदार किशोर पाटील यांचेसह ग्रामस्थ, कुटूंबिय उपस्थित होते. 
000000

*दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका सुरु* जळगाव, (जिमाका) दि. 23 - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच 19-सीपी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 25 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत. या अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनादेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा. शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.00000