Wednesday, 4 September 2024

राजुमामा आणि मामिनी केले जलपुजन

       
*वाघूर धरण जलपूजन ;*
*दोन वर्षांची जळगाव शहरासाठी पाण्याची चिंता मिटली आ सुरेश भोळे राजुमामा व सौ सीमाताई भोळे यांनी केले खन नारळ ची ओटी भरून केले जल पूजन
*जळगाव, ता. 4 :* जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे 100 टक्के पूर्ण भरले आहे. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज बुधवार, दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी शहराचे आमदार सुरेश भोळे राजूमामा व  माजी महापौर सौ.सीमाताई भोळे यानी सपत्नीक धरणस्थळी. वाघूर नदीचे साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले.यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता.या प्रसंगी आ.राजूमामा भोळे यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव 100 टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे बांधकाम 1978 मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा 100 टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जलचिंता ही मिटली आहे.


Monday, 2 September 2024

*वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन*

*वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन*

जळगाव दि. 2 ( जिमाका )  वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील 02 दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच मदतकार्याची गती वाढविणेबाबत सूचना केल्या.
    वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही मात्र वित्तहानी झालेली आहे.  बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणेत येत आहे. मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) ही मागविणेत आलेले असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदतकार्य करणेत येत आहे. तसेच जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इ. ठिकाणीही मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) नियुक्त करण्यात आलेले आहे. 
    तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जावु नये तसेच पशुधन ही नेऊ नये.  आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Monday, 30 January 2023

आणखी किती कोमल,कठोर पाउल उचलणार...?

हृदयद्रावक घटना...

आई ! माझ्या निलला न्याय देजो.. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

जळगावातील विवाहितेची नाशिकला सासरी आत्महत्या, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव, दि.३० - जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२७ रोजी घडली. दरम्यान, विष प्राशन केल्यावर विवाहितेने घरी आईला फोनवरून 'आई आई माझ्या निलला न्याय दे जो' अशी आर्त हाक घातली. पिढीजात संपत्तीत हिस्सा न देण्यासाठी तिचा छळ केल्याचे समोर आले असून पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरे या तरुणीचा २१ मार्च २०१६ रोजी नाशिक येथील अभिजीत राजेंद्र बेलगावकर यांच्यासोबत विवाह झाला होता. जुनी महानगरपालिका, मेन रोड येथे सर्व कुटुंबीय एकत्र राहत होते. पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय हिरावाडी येथे राहावयास गेले. दोघांच्या संसारावर निलराज हा मुलगा देखील झाला. काही दिवसांनी कोमलची सासू किरकोळ कारणावरून कोमल आणि तिची देरानी मीनाक्षी यांच्याशी वाद घालत असल्याने दोघे वेगवेगळ्या ठिकाणी रहावयास गेले.

गेल्या सहा महिन्यापासून कोमल ही पती अभिजीत आणि मुलगा निलराज असे तिघे चिंतामणी नगर, पंचवटी येथे भाड्याच्या घरात राहावयास आले होते. कोमलने स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू करून सर्व संसारोपयोगी साहित्य देखील खरेदी केले. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कोमलची आई मंगलाबाई देवरे या थायरॉईडच्या उपचारासाठी नाशिक येथे गेल्या होत्या. कोमलची देरानी मिनाक्षीचे पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरी गेल्याचे तिने आईला सांगितले. १ जानेवारी २०२३ रोजी कोमलची आई घरी परतली. काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी जुन्या घराची दुरुस्ती केली असून ते सर्व तिकडे राहायला जात असल्याचे तिला जेठाणी मेघाने सांगितले. कोमलने देखील पती अभिजीत यांना आपण तिकडे राहायला जाऊ असे सांगितले असता, मला तिकडे राहायचं नाही, मला ते घर पण नको असे ते बोलले. 

कोमल स्वतः सासू भारती यांच्याकडे गेली आणि आम्हाला देखील घरात राहू देण्याची विनंती केली असता सासूने नकार दिला. सासूने नकार दिला असता जुन्या संपत्तीमध्ये मुलगा निलराज याचे देखील नाव घावे असे कोमल सासूला बोलली असता त्यांनी देखील वाद घातले. सर्व प्रकार कोमलने मामसासरे ईश्वर चौधरी यांना कळविला. त्यांनी कोमलच्या सासरच्या मंडळींना याबाबत विचारणा केल्याने सर्वांना कोमलचा राग आला. त्यांनी कोमलचा छळ सुरू केला. पती अभिजीतने देखील तू प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असशील तर मी तुला घटस्फोट देऊन माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी दिली. तसेच कोमलच्या चारित्र्यावर संशय घेत तिला त्रास देणे सुरू केले. घडत असलेला सर्व प्रकार कोमलने आई मंगलाबाई व भाऊ कमलेश देवरे याला कळविला होता.

कोमल ताणतणावात असल्याने तिला माहेरच्या मंडळींनी समजावले होते. अभिजीतने कमलेशला घरातील वादविवाद वाढत असल्याने नाशिक येथे भेटण्यासाठी बोलाविले असता कामात असल्याने ३० जानेवारीनंतर आम्ही नाशिक येथे येतो असे सांगितले होते. दि.२७ रोजी सकाळी १०.३० वाजता कोमलने आईला फोन करून सांगितले की, माझी सासू, जेठ, जेठाणी, दिर हे मला धमकावत असून तुमची मिटिंग होऊ देणार नाही असे सांगत आहे. तुला तुझा हक्क मिळू देणार नाही असे म्हणत असून नवरा साथ देत नाही. मला काही न्याय मिळणार नाही, असे बोलून तिने फोन कट केला. कोमलच्या आईने त्यानंतर अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

११.३० वाजता एका अनोळखी क्रमांकावरून कोमलच्या आईला फोन आला. कोमलला उलट्या होत आहे असे एका अनोळखी महिलेने सांगताच कोमलने फोन घेतला आणि 'आई आई माझ्या निलला न्याय दे जो' असे बोलून फोन कट झाला. कोमलच्या आईने जावई अभिजीतला फोन केला असता मी त्र्यंबकला आहे. आई, दादा, वहिनी कोमलला पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळाने पुन्हा फोन केला असता कोमलला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून ती आयसीयूमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. कोमलची आई व वडिलांनी रेल्वेने रात्री नाशिक गाठले असता ९ वाजता डॉक्टरांनी तिने विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

कोमलची आई मंगलाबाई सुरेश देवरे यांनी फिर्यादी दिल्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात कोमलचा पती अभिजीत राजेंद्र बेलगावकर, सासू भारती, जेठ आकाश, जेठाणी मेघा, दिर अमित यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरनार करीत आहेत. मयत कोमल देवरे या जळगावातील पत्रकार कमलेश देवरे यांच्या भगिनी असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, मुलगा असा परिवार आहे.

Wednesday, 18 January 2023

सलिम इनामदार,राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मेहरून वॉर्ड क्रमांक 18 मध्ये रस्त्यांची मागणी.

*सलीम इनामदार यांची मागणी. मेहरून मास्टर कॉलनी वार्ड 18* चे त्वरित रस्त्यांचे काम नाही सुरु केल्यास अन्दोलन निवेदन, उपोषण करुंन लढा उभारवा लागेल*. मेहरून येथील( मास्टर कॉलनी, उमर मस्जिद रोड, रजा मस्जिद रोड़) अर्धवट सोडलेले काम मागील एक वर्षा पासुन अचानक काम बन्द क्ररुन मक्तेदारने काम बन्द केला। हां  रस्ता एका वर्षा मध्ये अर्धवट टुटलेला खड्डे पडलेले आहे। कोणीच आज पर्यन्त विचार्यला सुधा आलेला नाही। जलगॉव मनपा डोळे झाकुंन  बसलेला आहे। नागरिकांना कोणी , काय त्रास आहे कसे जीवन जगत आहे खुप वाइट अवस्था आहे। रोज चे लहान मोठे अपघात होत आहे, मोठा अपघात घडण्या ची शक्यता आहे। लवकरात लवकर अर्धवट सोडलेले रस्ते त्वरित बन्विन्यात यावे। अन्यथा नाइलाजे मनपा च्या विरोधात रस्त्यावर उतरून अंदोलंन करावा लागेल। सलीम इनामदार मीडिया प्रमुख राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी जालगॉव. सामाजिक कार्यकर्ते मेहरून वार्ड क्र १८ ज.

Thursday, 5 January 2023

राज्य ऑलिंपिक -नगरकर,सिद्दीकी आणि जयंत चौधरी यांची निवड...

*महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलावाचे खेळाडूंची निवड*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा 
2023 या दिनांक 1 ते 12 जानेवारी 2023 यादरम्यान संपन्न होणार आहे यात मॉडर्न पेटयथलॉन, वॉटर पोलो, ट्रायथलॉन स्पर्धा पुणे बालेवाडी येथे होणार आहे या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातर्फे पोलीस जलतरण तलावाचे खालील जलतरणपटू यांची निवड झालेली आहे
*वॉटर पोलो पुरुष संघ अमेय नगरकर,ओम चौधरी, तलाह सिद्दिकी, हर्षवर्धन महाजन टीम मॅनेजर हिदायत खाटीक सर*
*मॉडर्न पेटयथलॉन पुरूष अमेय नगरकर तलाह सिद्दिकी हर्षवर्धन महाजन ओम चौधरी आयान शेख महिला लाजरी खाचणे धनश्री जाधव जान्हवी महाजन टिम मॅनेजर सौ कुमुदिनी खाचणे, सौ दिपाली महाजन कोच गजानन महाजन रवींद्र चौधरी*
*ट्रायथलॉन महिला धनश्री जाधव टिम मॅनेजर राजीव जाधव*
 वरील स्पर्धेकरिता तांत्रिक पंच म्हणून  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या कडून *कमलेश नगरकर जयंत चौधरी सुरज दायमा**यांची निवड करण्यात आलेली आहे

Sunday, 27 November 2022

26-11 शहिदांना श्रद्धांजली अर्पण

(इंडिया365, अयाज मोहसिन)
:- सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे शहिदांना श्रद्धांजली -:
        भारताची आर्थिक तसेच  महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरावर आजच्या दिवशी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या दुष्ट सहकारी आतंकवाद्यांनी आज  भ्याड पणे हल्ला केलेला होता.  त्यात अनेक निष्पाप लोक तसेच भारत मातेचे वीर सुपुत्र, पोलीस या ठिकाणी देशाचे व देशवासीयांचे रक्षण करताना शहीद झालेले होते. 
          म्हणून 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली   अर्पित करण्यासाठी  आज सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे   संध्याकाळी 6:30 वाजता भीलपुरा चौकात  श्रद्धांजली  सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. 
          याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली  यांनी मनोगतात कशाप्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता व त्याला आपल्या वीर  जवानांनी कशाप्रकारे उत्तर दिलेले होते.   आपल्या वीर जवानांची शौर्यगाथा उपस्थित लोकांसमोर सांगितली.   तसेच अल्लाने फर्मविले आहे की जो कोणी एका निर्दोष व्यक्तीची हत्या करेल  त्याला संपूर्ण मानव जातीची हत्या केल्याचा पाप लागेल.  अशा अतिरेक्यांना नरकात  सुद्धा जागा भेटणार नाही असे  उपस्थितांना सांगितले. प्रसंगी पाकिस्तान व आतंकवाद्यांचा निषेध करण्यात येऊन   पेटत्या  मेणबत्त्या हातात घेऊन दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत  करकरे,  शहीद अशोक कामटे,  शहीद विजय साळसकर,  शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन,  शहीद तुकाराम  यांच्यासह निष्पाप शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
           याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली.   हाजी शेख सलीम उद्दीन,  डॉ.परीमल मुजुमदार,  शेख जलालुद्दीन,  सुरज गुप्ता,  शफी ठेकेदार,  मोहम्मद खान,  योगेश मराठे,  जावेद बागवान,  सलमान मेहबूब,  झिशान हुसैन,  नितीन शिंपी,  सय्यद वकार,  रहीम कुरेशी,  शेख शरीफ,  सत्तार शेख,   शाकीब  फारुख,  दानिश कुरेशी,  शेख ओवेश,  शेख अयान,  रिजवान लतीफ,  असलम नागोरी,  भिकन शिकलकर,  शफिक अहमद,  आरिफ मुनाफ,  अमित मुजुमदार,  रवींद्र खैरनार,  शेख नवाज,  इलियास बागवान,  शेख मुजम्मिल,  रहीम इस्माईल  यांसह नागरिक उपस्थित होते. 

फोटो :-  शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे  सदस्य. 

          

Tuesday, 22 November 2022

जळगाव येथे महाक्रिटीकॉन संपन्न..

(इंडिया365 न्यूज़,अयाज द इंडियन)
जळगाव मध्ये प्रथमच जळगाव क्रिटिकल केअर सोसायटी ने  महा क्रीटीकॉन २०२२ हि राज्य स्तरीय परिषद १८ ,१९ ,२०  नोव्हे  रोजी हॉटेल प्रेसिडेंट इथे आयोजित करण्यात आली.
१८ तारखेला एकच दिवशी ६ वेगवेगळे  कार्यशाळा घेण्यात आले.
त्यात सोनोग्राफी आणि इको इन  आय सी यू हे  कार्यशाळा   गवर्न मेंट मेडिकल कॉलेज इथे घेण्यात आले.
गर्भवती माता सिरीयस झाल्यावर तत्काळ कसे उपचार करून  आई  व बाळ कसे सुरक्षित राहील याचे प्रयत्न शिकविले. 
व्हेंटिलेटर सिस्टीम ,  याचे शिक्षण दिले.
सर्पदंश, विषबाधा यावर एक कार्यशाळा झाली .
ब्लड प्रेशर आणि नवीन तंद्रद्यान यावर एक कार्यशाळा झाली त्याचे डायरेक्टर डॉ शीला मित्रा या राज्यस्तरीय क्रिटिकल परिषदेच्या अध्यक्ष उपस्थित होत्या. डॉ जिगिशू दिवतिया हे राज्यस्तरीय भूलतज्ज्ञ परिषदेचे अध्यक्ष हे यावेळी उपस्थिती होते.
डॉ कपिल झिरपे ,डॉ शिवकुमार आयेर , डॉ राजेश पांडे ,डॉ बाळासाहेब बांडे,  डॉ प्रदीप  डी कोस्टा डॉ सुनील पांड्या  या मान्यवरांनी
६    कार्यशाळा एकच वेळी  वेगवेगळ्या ठिकाणी शेवटपर्यंत चालले..
दुसऱ्या दिवशी १९,२० या रोजी २दिवस सगळे  क्रिटिकल केअर मधील सगळे सेमिनार घेतले .
याला faculty he पुणे ,मुंबई ,लुधियाना ,हैद्राबाद , जम्मू काश्मीर , देल्ही ,सोलापूर कोल्हापूर  , औरंगाबाद ,नांदेड ,नारायणगाव , बारामती येथून डॉक्टर्स उपस्थिती होती.

ही राज्य परिषद
डॉ पराग चौधरी,डॉ सुनील सूर्यवंशी 
डॉ राजेश डlबी अध्यक्ष 
डॉ राहुल महाजन .उपाध्यक्ष
डॉ लीना पाटील . सेक्रेटरी 
डॉ रवींद्र पाटील सेक्रेटरी
खजिनदार - डॉ पल्लवी राणे.
डॉ अमित हीवरकर 

यांच्या टीम द्वारे पार पडली. 
सिनियर फिजिशियान डॉ के  डी पाटील , डॉ किरण मुठे
डॉ सुभाष चौधरी यांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभले .
परिषदेचे उद्घाटन 
डॉ उल्हास पाटील ,  डॉ  मारुती पोटे ( goverment medical collage ,)
यांच्या हस्ते झाले .
परिषदेला  डॉ सुनील चौधरी  
डॉ दीपक पाटील ,डॉ दिलीप पाटील ,डॉ राजेश मांवतकर 
डॉ हरणखेडकर , डॉ प्रकाश सुरवाडे , डॉ विनोद किणगे डॉ शशिकांत गाजरे ,  डॉ चेतन चौधरी ,डॉ अभय जोशी डॉ  फराज  बोहरी

डॉ कल्पेश गांधी ,डॉ सूयोग चौधरी , डॉ स्वप्नील चौधरी ,डॉ ललित पाटील ,डॉ अमित राजपूत,डॉ सोनाली महाजन , 

,डॉ प्रियिंका पाटील , डॉ ऋतुराज , डॉ दीपाली साठे, , डॉ संदीप भारुडे   ,डॉ धीरज चौधरी , डॉ नेहा भंगाळे, डॉ अमित भंगाळे ... डॉ सुवर्णा  जोशी ..डॉ गुणवंत महाजन  ,डॉ मनोज पाटील  यांनी वर्कं शॉप  coordinators  यांची मदत झाली ..
५०० हून अधिक वर्कशॉप आणि कॉन्फरन्स मध्ये रजिस्टर केले .आणि या परिषदे लाभ घेतला.
पेपर प्रेझेंटेशन -२५ जणांनी केला
पोस्टर  प्रेझेंटेशन २७  जणांनी  केले.
ऑर गन डोनेशन स्की ट शो डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज  येथील  इन्टरन  आणि  आय एस सी सी एम  चे डॉक्टर्स  डॉ रवी गावात (जुपितर हॉस्पिटल मुंबई )यांनी पार पडला..त्यावेळी आय एम ए अध्यक्ष - डॉ दीपक आठवले
सेक्रेटरी - डॉ जितेंद्र कोल्हे हे उपस्थित.होते .
यावेळी जळगावमधील महिलेचे जीचे ब्रेन डेड म्हणून औरंगाबाद मघे नेऊन सगळे ऑर्गन डोनेशन साठी पाठवले त्यांचे पती व वडील यांचे आभार मानले..
मेडी को लीगल पॅनल च्या सेमिनार मध्ये आपले जळगाव जिल्ह्यातील  एस पी..आर राजकुमार यांचे विशेष सहकार्य लाभले.