Sunday, 6 June 2021

'रत्न' पुरस्कार हाजिसाहब को मरणोपरांत घोषित

 इंडिया365,अयाज मोहसिन.


मरहूम हाजी डॉक्टर गफ्फार मलिक,इन्हे मनपा की ओर से मरणोत्तर "जलगाव रतन" की घोषणा की गयी है.ये घोषणा महापौर जयश्री ताई महाजन द्वारे की गइ,आप को बता दे के जब


हाजी गफ्फार मलिक हयात थे तभि उन्हे मानद PHd डॉक्टरेट प्रदान की गायी थी,साथ ही मे "भारतरत्न डॉ ए पी जे कलाम-अवॉर्ड ऑफ एक्सलेन्स" भी प्राप्त था.

अब जैसे ही उचित परिस्थिती आयेगी,एक शानदार समारोह मे उनके प्रतिनिधी को 'जलगाव रतन" प्रदान किया जायेगा.

Friday, 4 June 2021

हॅप्पी न्यूज-दोन दिवसानंतर लॉक डॉउन 'अनलॉक'


 *व्हेरी हॅप्पी न्यूज*


*अखेर राज्य लोकडोउन मुक्त होणार,नक्की वाचा काय काय सुरू होणार?*


( *"इंडिया365"*,अयाज मोहसिन)


महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.

काल 4 जूनला मध्यरात्री याविषयी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत ५ स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. प्रत्येक आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.


महत्त्वाचे म्हणजे पहिला टप्पा जिथे ५ % पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ % ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.


१ली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ %, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.


२री लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.


३री लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते 10 % असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील


४थी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट १० ते 20 % असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर


५ लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील


पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे

दुसर्‍या टप्प्यात ६ जिल्हे

तिसरा १० जिल्हे

चौथ्या टप्प्यात २ जिल्हे

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ ( पहिल्या टप्प्यातील जिल्हे )


रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये १०० % सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० % सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० % क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे


मुंबई


मुंबई उपनगर


अहमदनगर


अमरावती


हिंगोली


नंदुरबार


दुसऱ्या टप्प्यात काय सुरु?

५० % हाॅटेल सुरू, माॅल चित्रपटगृह – ५० % ,लोकल- नाही सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू, शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली, क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९, संध्याकाळी ५ ते ९ सुरू – इनडोअर आणि आऊटडोर, शुटिंग चित्रपट सुरू, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले, लग्न सोहळा मॅरेज हाॅल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत, अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल,मिटींग आणि निवडणूक ५० % उपस्थितीत, बांधकाम, कृषी काम खुली, इ काॅमर्स सुरू, जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० % सुरू, शासकीय बस आसाम क्षमता १०० % सुरू, जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे


अकोला


बीड


कोल्हापूर


उस्मानाबाद


रत्नागिरी


सांगली


सातारा


सिंधुदुर्ग


अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील

माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० % खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील, लोकल रेल्वे बंद राहतील.

मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा, ५० % खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू, आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार, स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल, मनोरंजन कार्यक्रम ५० % दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार


लग्नसोहळ् ५० % क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील, बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा, कृषी सर्व कामे मुभा, ई काॅम्रस दुपारी २ पर्संत, जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

चौथ्या टप्प्यात – पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे

अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु, सरकारी खासगी कार्यालयात २५ % उपस्थिती राहणार, क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही, लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार


अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार, बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार

शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार, ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध

संचार बंदी लागू असणार, सलून, जिम ५० % क्षमता सुरु राहणार, बसेस ५० % विना उभे राहणारे प्रवाशी

५ वा टप्पा, रेड झोनमध्ये, पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये, ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड ७५ % फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील

Friday, 14 May 2021

अब्बू ईद के दिन भी कम्प्युटर से चिपके


 युनुसची मुलगी ॲनी म्हणाली, *ईद के दिन भी अब्बू कंप्युटर पे लगे रहते है*


*अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील युनुस शहा यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी*


(संकलन-अयाज मोहसिन, इंडिया365 लाईव्ह) 9273403088.


अमरावती--- अब्बू जब देखो तब कंप्युटरपे लगे रहते है… कोरोना साथीच्या काळात गत वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या युनुस शहा यांची ॲनी अस्मिर ही चार वर्षांची चिमुकली सांगत होती. कोरोना साथीच्या काळात आयसीएमआर व आरोग्य यंत्रणेसाठी डेटा संकलनाची व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्‍या युनुस शहा यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी झाली.

श्री.शहा हे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत आहेत. कोविडबाधितांवरील उपचारांना गती देण्याबरोबरच आरोग्य यंत्रणेचे काम विविध पातळ्यांवर सुरु असते. सीएस ऑफिसमधील सहकाऱ्‍यांना कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल वेळोवेळी मिळवणे, याद्या तयार करणे, त्यासाठी लॅब, रुग्णालये व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय राखणे, आयसीएमआर पोर्टलसाठी डेटा संकलन करणे, त्यात वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊन तशा नोंदी घेणे अशी अनेकविध कामे अव्याहतपणे करावी लागतात.

दवाखान्यात नवे रूग्ण येणे, नव्या चाचण्या, नवे निष्कर्ष प्राप्त होणे, नव्याने काही दुरुस्त्या कराव्या लागणे हे सातत्याने सुरुच असते. या सगळ्या नोंदी त्या-त्या वेळीच घ्याव्या लागतात. त्यामुळे थांबून चालत नाही. सगळ्या बाबी नीट लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे मी व माझ्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या वाटून घेतल्या. गौरव इंगळे, शिवानी गहलोत, अविनाश शेंडे, साखरकर मॅडम, श्रीकांत शहाणे, दीपक लकडे, विशाल काळे, अनिकेत खाडे असे अनेक सहकारी कोविड रिपोर्टिंग सेंटरमध्ये अविरत कार्यरत आहेत…युनुस शहा सांगत होते.

डेटा अपडेशन सतत सुरु असते

जे काम जी व्यक्ती करत असते, तिने एक दिवसही थांबून चालत नाही. कारण, त्याच्या वर्गीकरणाच्या पद्धती, आयसीएमआरचे नियम, रुग्णालयांची माहिती व समन्वय प्रक्रिया याबाबतची अनेकविध प्रकारची माहिती ते काम नित्य करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यालाच अधिक चांगले अवगत असते. साथीच्या या काळात हे काम अधिकाधिक निर्दोष होणे आवश्यक आहे.  त्यामुळे रजा घेता येत नाही व अनेक कामे एकहातीही करावी लागतात. सायंकाळी ऑफिस सोडले तरी घरी गेल्यावर उशिरापर्यंत काम सुरूच असते. सकाळी उठल्यावरही माहिती अपडेशनचे काम सुरु होते.

घरी गेल्यावर कुटुंबासोबत असतो, मात्र, कार्यालयीन काम सुरुच ठेवावे लागते. मध्ये मध्ये मुलांशी खेळायला वेळ मिळतो. युनुसला ॲनी अस्मिर ही चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा अकदस हा मुलगा आहे. आज मुलांसोबत राहून पण आपले कार्यालयीन कर्तव्य पूर्ण करून युनुसने ईद साजरी केली. अब्बू जब देखो तब कंप्यूटर पे लगे रहते है, अशी त्याच्या चिमुकलीची तक्रार आहे.

Monday, 19 April 2021

फुफ्फुस सोपी टेस्ट

 *फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती*


मुंबई, दि. १९: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

*चाचणी कोणी करावी*

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात. 

*अशी करावी चाचणी*

ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.

सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.

*चाचणीचा निष्कर्ष*

जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्या सारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. 

ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालुन ही चाचणी करू शकतात.


Friday, 2 April 2021

रेमदेसीविर-MRP वर विकू नये

 रेमदेसीविर इंजेक्शन संदर्भात होणारा काळाबाजार,कृत्रिम टंचाई,साठेबाजी थांबविण्या बाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिशानिर्देश नव्याने 3 एप्रिल रोजीजारी केले आहेत

*आता रेमदेसीविर इंजेक्शन पेशन्ट ला विकताना नेट प्राईस+10 टक्के,फक्त इतक्या मर्यादेतच विकता येईल*

1) होलसेलर विक्रेत्यांनी रेमदेसीविर, Tosilizumab,Itiizumab विकतांना सरकारी कोविड सेंटर,जिल्हा शल्य चिकित्सक (C.S.) यांनी मान्यता दिलेले कोविड सेंटर, यांना प्राधान्य देण्यात यावे.परवाना धारक औषध विक्रेते,शासन मान्य वैद्यकीय व्यवसयी यांनाच पुरवठा करावा.


2)शासनमान्य वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर च्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खासगी व्यक्ती ला सदर इंजेक्शन विकू नये.


3) सदर औषधे यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी,औषध होलसेल आणि रिटेल यांनी घ्यावी.

रेमदेसीविर विक्रीवर लागला प्रोटोकॉल

 रेमदेसीविर इंजेक्शन संदर्भात होणारा काळाबाजार,कृत्रिम टंचाई,साठेबाजी थांबविण्या बाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिशा निर्देश जारी केले आहेत

1) होलसेलर विक्रेत्यांनी रेमदेसीविर, Tosilizumab,Itiizumab विकतांना सरकारी कोविड सेंटर,जिल्हा शल्य चिकित्सक (C.S.) यांनी मान्यता दिलेले कोविड सेंटर, यांना प्राधान्य देण्यात यावे.परवाना धारक औषध विक्रेते,शासन मान्य वैद्यकीय व्यवसयी यांनाच पुरवठा करावा.


2)शासनमान्य वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर च्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खासगी व्यक्ती ला सदर इंजेक्शन विकू नये.


3) सदर औषधे यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी,औषध होलसेल आणि रिटेल यांनी घ्यावी.


Friday, 5 March 2021

अरे बापरे -772 पॉजिटिव...

इंडिया365--हार्ट ब्रेकिंग न्यूज़,

दूसरी लहर में मचा कहर,

जिले में 772 (जलगांव शहर 266+93=359)

सतर्क हो जाओ,जिला वासियो,चैन की नींद सोना है तो जाग जाओ...


दूसरी लहर के सबसे बड़े पोजटिव आंकड़े