Sunday, 27 November 2022

26-11 शहिदांना श्रद्धांजली अर्पण

(इंडिया365, अयाज मोहसिन)
:- सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे शहिदांना श्रद्धांजली -:
        भारताची आर्थिक तसेच  महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरावर आजच्या दिवशी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या दुष्ट सहकारी आतंकवाद्यांनी आज  भ्याड पणे हल्ला केलेला होता.  त्यात अनेक निष्पाप लोक तसेच भारत मातेचे वीर सुपुत्र, पोलीस या ठिकाणी देशाचे व देशवासीयांचे रक्षण करताना शहीद झालेले होते. 
          म्हणून 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली   अर्पित करण्यासाठी  आज सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे   संध्याकाळी 6:30 वाजता भीलपुरा चौकात  श्रद्धांजली  सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. 
          याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली  यांनी मनोगतात कशाप्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता व त्याला आपल्या वीर  जवानांनी कशाप्रकारे उत्तर दिलेले होते.   आपल्या वीर जवानांची शौर्यगाथा उपस्थित लोकांसमोर सांगितली.   तसेच अल्लाने फर्मविले आहे की जो कोणी एका निर्दोष व्यक्तीची हत्या करेल  त्याला संपूर्ण मानव जातीची हत्या केल्याचा पाप लागेल.  अशा अतिरेक्यांना नरकात  सुद्धा जागा भेटणार नाही असे  उपस्थितांना सांगितले. प्रसंगी पाकिस्तान व आतंकवाद्यांचा निषेध करण्यात येऊन   पेटत्या  मेणबत्त्या हातात घेऊन दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत  करकरे,  शहीद अशोक कामटे,  शहीद विजय साळसकर,  शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन,  शहीद तुकाराम  यांच्यासह निष्पाप शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
           याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली.   हाजी शेख सलीम उद्दीन,  डॉ.परीमल मुजुमदार,  शेख जलालुद्दीन,  सुरज गुप्ता,  शफी ठेकेदार,  मोहम्मद खान,  योगेश मराठे,  जावेद बागवान,  सलमान मेहबूब,  झिशान हुसैन,  नितीन शिंपी,  सय्यद वकार,  रहीम कुरेशी,  शेख शरीफ,  सत्तार शेख,   शाकीब  फारुख,  दानिश कुरेशी,  शेख ओवेश,  शेख अयान,  रिजवान लतीफ,  असलम नागोरी,  भिकन शिकलकर,  शफिक अहमद,  आरिफ मुनाफ,  अमित मुजुमदार,  रवींद्र खैरनार,  शेख नवाज,  इलियास बागवान,  शेख मुजम्मिल,  रहीम इस्माईल  यांसह नागरिक उपस्थित होते. 

फोटो :-  शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे  सदस्य. 

          

Tuesday, 22 November 2022

जळगाव येथे महाक्रिटीकॉन संपन्न..

(इंडिया365 न्यूज़,अयाज द इंडियन)
जळगाव मध्ये प्रथमच जळगाव क्रिटिकल केअर सोसायटी ने  महा क्रीटीकॉन २०२२ हि राज्य स्तरीय परिषद १८ ,१९ ,२०  नोव्हे  रोजी हॉटेल प्रेसिडेंट इथे आयोजित करण्यात आली.
१८ तारखेला एकच दिवशी ६ वेगवेगळे  कार्यशाळा घेण्यात आले.
त्यात सोनोग्राफी आणि इको इन  आय सी यू हे  कार्यशाळा   गवर्न मेंट मेडिकल कॉलेज इथे घेण्यात आले.
गर्भवती माता सिरीयस झाल्यावर तत्काळ कसे उपचार करून  आई  व बाळ कसे सुरक्षित राहील याचे प्रयत्न शिकविले. 
व्हेंटिलेटर सिस्टीम ,  याचे शिक्षण दिले.
सर्पदंश, विषबाधा यावर एक कार्यशाळा झाली .
ब्लड प्रेशर आणि नवीन तंद्रद्यान यावर एक कार्यशाळा झाली त्याचे डायरेक्टर डॉ शीला मित्रा या राज्यस्तरीय क्रिटिकल परिषदेच्या अध्यक्ष उपस्थित होत्या. डॉ जिगिशू दिवतिया हे राज्यस्तरीय भूलतज्ज्ञ परिषदेचे अध्यक्ष हे यावेळी उपस्थिती होते.
डॉ कपिल झिरपे ,डॉ शिवकुमार आयेर , डॉ राजेश पांडे ,डॉ बाळासाहेब बांडे,  डॉ प्रदीप  डी कोस्टा डॉ सुनील पांड्या  या मान्यवरांनी
६    कार्यशाळा एकच वेळी  वेगवेगळ्या ठिकाणी शेवटपर्यंत चालले..
दुसऱ्या दिवशी १९,२० या रोजी २दिवस सगळे  क्रिटिकल केअर मधील सगळे सेमिनार घेतले .
याला faculty he पुणे ,मुंबई ,लुधियाना ,हैद्राबाद , जम्मू काश्मीर , देल्ही ,सोलापूर कोल्हापूर  , औरंगाबाद ,नांदेड ,नारायणगाव , बारामती येथून डॉक्टर्स उपस्थिती होती.

ही राज्य परिषद
डॉ पराग चौधरी,डॉ सुनील सूर्यवंशी 
डॉ राजेश डlबी अध्यक्ष 
डॉ राहुल महाजन .उपाध्यक्ष
डॉ लीना पाटील . सेक्रेटरी 
डॉ रवींद्र पाटील सेक्रेटरी
खजिनदार - डॉ पल्लवी राणे.
डॉ अमित हीवरकर 

यांच्या टीम द्वारे पार पडली. 
सिनियर फिजिशियान डॉ के  डी पाटील , डॉ किरण मुठे
डॉ सुभाष चौधरी यांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभले .
परिषदेचे उद्घाटन 
डॉ उल्हास पाटील ,  डॉ  मारुती पोटे ( goverment medical collage ,)
यांच्या हस्ते झाले .
परिषदेला  डॉ सुनील चौधरी  
डॉ दीपक पाटील ,डॉ दिलीप पाटील ,डॉ राजेश मांवतकर 
डॉ हरणखेडकर , डॉ प्रकाश सुरवाडे , डॉ विनोद किणगे डॉ शशिकांत गाजरे ,  डॉ चेतन चौधरी ,डॉ अभय जोशी डॉ  फराज  बोहरी

डॉ कल्पेश गांधी ,डॉ सूयोग चौधरी , डॉ स्वप्नील चौधरी ,डॉ ललित पाटील ,डॉ अमित राजपूत,डॉ सोनाली महाजन , 

,डॉ प्रियिंका पाटील , डॉ ऋतुराज , डॉ दीपाली साठे, , डॉ संदीप भारुडे   ,डॉ धीरज चौधरी , डॉ नेहा भंगाळे, डॉ अमित भंगाळे ... डॉ सुवर्णा  जोशी ..डॉ गुणवंत महाजन  ,डॉ मनोज पाटील  यांनी वर्कं शॉप  coordinators  यांची मदत झाली ..
५०० हून अधिक वर्कशॉप आणि कॉन्फरन्स मध्ये रजिस्टर केले .आणि या परिषदे लाभ घेतला.
पेपर प्रेझेंटेशन -२५ जणांनी केला
पोस्टर  प्रेझेंटेशन २७  जणांनी  केले.
ऑर गन डोनेशन स्की ट शो डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज  येथील  इन्टरन  आणि  आय एस सी सी एम  चे डॉक्टर्स  डॉ रवी गावात (जुपितर हॉस्पिटल मुंबई )यांनी पार पडला..त्यावेळी आय एम ए अध्यक्ष - डॉ दीपक आठवले
सेक्रेटरी - डॉ जितेंद्र कोल्हे हे उपस्थित.होते .
यावेळी जळगावमधील महिलेचे जीचे ब्रेन डेड म्हणून औरंगाबाद मघे नेऊन सगळे ऑर्गन डोनेशन साठी पाठवले त्यांचे पती व वडील यांचे आभार मानले..
मेडी को लीगल पॅनल च्या सेमिनार मध्ये आपले जळगाव जिल्ह्यातील  एस पी..आर राजकुमार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Thursday, 13 October 2022

अबब मंडळ अधिकाऱ्याने मागितली 2 लाखाची लाच,पण अडकला..

*==*  *प्रेसनोट* *==*
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* जळगाव.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-30
रा.अमळनेर ,ता.अमळनेर, जि.जळगाव.
▶️ *आलोसे-*  
*१)* गणेश राजाराम महाजन,वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर. रा.नविन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव जि.जळगाव  वर्ग-३
*२)* दिनेश आनंद सोनवणे, वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी,अमळनेर रा.फरशी रोड,अमळनेर. ता.अमळनेर जि.जळगाव. वर्ग-3                                                                                        
▶️ *लाचेची मागणी-* 2,00,000/-रुपये तडजोडीअंती 1,50,000/-रुपये.
▶️ *लाच स्विकारली-* 1,50,000/-रु.
▶️ *हस्तगत रक्कम-* 1,50,,000/-रू.
▶️ *लाचेची मागणी -* दि.12/10/2022 
▶️ *लाच स्विकारली-* दि.13/10/2022
▶️  *लाचेचे कारण -*.  
तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या  मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 व 2 यांनी पंचासमक्ष 1,50,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम 1,50,000/-रुपये आरोपी क्रं.1 यांनी तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा.              
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी-* 
श्री.शशिकांत एस.पाटील,पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
▶️ *तपास अधिकारी-* 
एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक, 
अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
▶️ *सापळा व मदत पथक-*  
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.
▶️ *मार्गदर्शक-* 
*1)* मा.श्री.सुनिल कडासने साो, 
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. 
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* 
*1)* आलोसे क्रं.1 यांचे सक्षम अधिकारी 
मा.उपविभागीय अधिकारी साो, अमळनेर विभाग,अमळनेर.          
*2)* आलोसे क्रं.2 यांचे सक्षम अधिकारी 
मा.जिल्हाधिकारी सो,जळगाव.
-----------------------------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.  अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव.
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================

Sunday, 11 September 2022

क्या होते है 'उर्दु घर'-जलगांव मे भी उर्दु घर की मांग...

उर्दु घर म्हणजे काय?
क्या होते है उर्दु घर?
जलगांव मे भी हो उर्दु घर....
(अयाज़ मोहसिन,चिफ एडिटर "इंडिया365" की रिपोर्ट,सूत्र महाराष्ट्र सरकार)

*महाराष्ट्रातील उर्दू घरे*

भारतात जन्मलेल्या आणि त्यामुळे अस्सल भारतीय असलेल्या उर्दू भाषेची वाङमयीन प्रगती व्हावी, तसेच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण वाढावी यासाठी राज्यामध्ये ४ उर्दू घरांची निर्मिती करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या या उपक्रमाविषयी माहिती देणारा हा विशेष लेख...

००००

बात करनेका हसीं तौर-तरीक़ा सीखा, हमने उर्दूके बहानेसे सलीक़ा सीखा...

उर्दू भाषेचे वर्णन करताना कवी मनीश शुक्ला यांनी हा शेर रचला आहे. उर्दू ही एक अतिशय गोड भाषा मानली जाते. भारतीय साहित्याच्या विकासात उर्दू भाषेने बहुमोल असे योगदान दिले आहे. मुळात उर्दू भाषेचा जन्म भारतातच झालेला असल्याने ही एक अस्सल भारतीय भाषा आहे. महाराष्ट्रामध्येही उर्दू भाषेचा मोठा प्रभाव असून विशेषतः  बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये उर्दू भाषेने आपल्या रसाळ वाणीने गोडवा आणला आहे. मराठवाडा, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये उर्दू भाषेच्या रसिकांची संख्या फार मोठी आहे. अशा या रसाळ उर्दू भाषेची वाङमयीन प्रगती व्हावी, तसेच मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाण-घेवाण वाढावी यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येतात. उर्दू भाषेच्या विकासासाठी एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही उर्दू भाषिकबहुल शहरांमध्ये उर्दू घर उभारण्यात येत आहेत.

सद्य:स्थितीत नांदेड, मालेगाव, सोलापूर आणि नागपूर येथे उर्दू घरे उभारण्यात येत आहेत. नांदेड आणि मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण झाले असून सोलापूर उर्दू घराचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागपूर उर्दू घराचे काम सुरु आहे. नांदेड उर्दू घराचे उद्घाटनही करण्यात आले आहे. या उर्दू घरामध्ये कॉन्फरन्स हॉल, वाचनालय, क्लासरुम, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १ कक्ष, पाहुण्यासांठी २ कक्ष तसेच १ ग्रीन रुम बांधण्यात आलेली आहे.

या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी धोरण आखण्यात आले असून सविस्तर नियमावली जारी करण्यात आलेली आहे. उर्दू घराच्या इमारती या राज्य शासनाच्या मालकीच्या राहतील, उर्दू घराचे नियंत्रण व व्यवस्थापन संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारीपेक्षा कमी नाही अशा दर्जाचे अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले आहे. 

उर्दू घरांचा वापर हा प्रामुख्याने व प्राधान्याने उर्दू भाषेचा प्रसार व विकास, उर्दू साहित्याचा व कलात्मतेचा प्रसार व विकास, नाट्य, शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य व त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करण्यात यावा. इतर वेळी संबंधित जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने उर्दूशिवाय अन्य भाषांच्या साहित्यिक व सांस्कृतिक स्वरुपाचे कार्यक्रम घेण्यासाठी उर्दू घराचा वापर करता येईल, असेही धोरण निश्चित करण्यात आले आहे. उर्दू भाषा, मराठी भाषा आणि इतर भाषांमध्ये देवाण-घेवाण वाढावी, हा यामागे उद्देश आहे. उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे.

उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रम इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय/ ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविण्यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविण्याचे प्रयत्न केले जातील. त्या अनुदानातून काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न केले जातील.

कोणत्याही परिस्थितीत उर्दू घराचा वापर राजकीय, खाजगी किंवा धार्मिक उद्दीष्टांकरिता करण्यात येणार नाही, असे निदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाकरिता उर्दू घर प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यासाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. तसेच उर्दू भाषा व उर्दू साहित्याशी संबंधित कार्यक्रमांकरिता सवलतीचे दर आकारण्यात येतील, असे धोरण निश्चित करून तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

भाषा ही नेहमीच समाजाला जोडण्याचे काम करते. उर्दू भाषेने आपल्यातील गोडवा, इतरांप्रती व्यक्त होणारा आदरभाव अशा अनेक गुणांनी इतर भाषिक लोकांच्या मनातही स्थान निर्माण केले आहे. उर्दू भाषा, त्यातील गजला, शेरोशायरी लोकांना नेहमीच आवडतात, सर्वच भाषकांची याला नेहमीच दाद मिळते. त्यामुळे उर्दू भाषेने देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यालाच अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक विकास विभागामार्फत उर्दू घरांची निर्मिती करून या भाषेच्या विकासाला तसेच मराठी-उर्दूची देवाणघेवाण वाढविण्याला चालना देण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उभी राहत असलेली ही ४ उर्दू घरे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक विकासात बहुमोल योगदान देतील, असे निश्चितपणे वाटते.

शेवटी अशोक साहिल यांच्या उर्दू भाषेविषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या या शायरीने या लेखाचा समारोप करतो. ते म्हणतात - 
उर्दूके चंद लफ़्ज़ हैं जबसे ज़बान पर, तहज़ीब मेहरबाँ है मेरे ख़ानदान पर...

००००

Friday, 26 August 2022

सर्जा राजा चा असाही भावनिक सन्मान !

*जैन हिल्स येथे सर्जा-राजाचा पोळा सण उत्साहात साजरा*

*जळगाव दि.26 (प्रतिनीधी)* - संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक... पावरी नृत्य, आदिवासी नृत्य सोंग व घोडा, गुरख्या डेंगा… हनुमान पार्वती मोर नंदीनृत्याविष्कार.. ढोल बाजाचा गजर… ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद... ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष श्री. अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या फुगडीसह... विदेशी नागरीक डॅनियल हदाद (इस्त्राईल) यासह मान्यवरांनी, अनुभूती स्कूलचे विद्यार्थ्यांनी, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्यांवर नृत्यांसह ठेका धरत आनंद द्विगणीत केला. जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला.

जैन कृषि संशोधन केंद्राच्या ध्यानमंदिरापासून मिरवणूकीस सुरवात झाली. श्रद्धाज्योत या श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या समाधीस्थळी बैलांच्या मिरवणूकीने प्रदक्षिणा घातली व वंदन केले. त्यानंतर श्रद्धाधाम, सरस्वती पॉईंट मार्ग सवाद्य मिरवणू्क काढण्यात आली होती. मुख्य सोहळा जैन हिल्स हेली पॅड येथील मैदानावर झाला. यावेळी व्यासपीठावर अणूशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, महात्मा गांधीजींचे पणतू श्री. तुषार गांधी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, श्री. राजा मयूर, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. एम. पी. मथाई यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

अशोक जैन यांनी पोळा फोडण्याच्या सोहळ्यासाठी हिरवी झेंडी दाखविली. सालदार अविनाश गोपाल यांनी पोळा फोडण्याचा मान मिळविला. सौ. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना गोड घास भरविला. जैन परिवारातील सर्वात लहान सदस्य अर्थम अथांग जैन याच्याहस्ते सुद्धा घास भरविण्यात आला. भव्य अशा व्यासपीठावर सप्तधान्याची रास, शेती उपयोगी अवजारांचे पूजन अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

*भूमिपुत्रांचा सत्कार*

जैन कृषि संशोधन विकास केंद्रातील विविध ठिकाणांवर 25 च्यावर बैल जोड्या आहेत. त्यांच्यासाठी 35 च्यावर सालदार गडी शेती-मातीत राबत असतात. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व जैन परिवाराच्या हस्ते सर्व सालदारांचा परिवारासह सत्कार व संसारोपयोगी साहित्य भेट सन्मानाने देऊन गौरव करण्यात आला.

'भारतीय संस्कृती, कृषी सांस्कृतिक वैभवाचा जैन हिल्स परिसरात मला अनुभव आला. प्रत्यक्ष सहभाग घेता आल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया डॅनियल हदाद यांनी दिली.’

'ऋषभराजाला ऊर्जास्वरूपात आजही शेतीमध्ये स्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शेतीमध्ये ऋषभराजाला अनन्य साधारण महत्त्व त्याचमुळे प्राप्त झालेले आहे. पोळ्याच्या दिवशी ऋषभराजाचे पूजन त्याच्या कष्टाप्रती केलेला सन्मानच ठरतो अशी भावना डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.’

'डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी भवरलालजी जैन यांची आठवण काढत पोळा सणात लोकसंस्कृती जोडली याचे नाविन्य जपत त्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्याचे सुरू केले ही कृषी संस्कृती पुढच्या पिढीनेही जपली आहे याचा आनंद आहे. पोळा हा सण कान्हदेशात सांस्कृतिक मूल्य जोपासणारा ठरलेला आहे असेही ते म्हणाले.’

'सण-उत्सव वर्षभर येत असतात मात्र बळिराजा आणि त्याच्यासोबत राबणाऱ्या सर्जा-राजाचा कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा बंधूभाव जोपासणारा वाटतो. गत 25 वर्षापासून हा सण जैन हिल्सला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन म्हणाले.’

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले शेतकरी बांधव हे त्यांच्या परिवारासह उपस्थितीत होते. या पोळा सणाच्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनच्या सर्व विभागातील सर्व सहकारी प्रयत्न केले. या कार्यक्रमात सहकारी हे परिवारासह उपस्थिती होते. यासह अनुभूती निवासी स्कूलमधील 200 हून अधिक विद्यार्थी, गांधी तीर्थ येथे देशभरातून अभ्यासक्रमासाठी आलेले विद्यार्थीही उपस्थितीत होते.


*फोटो कॅप्शन* - (_LDH6203) – ऋषभराजाला पोळा कार्यक्रमाच्या व्यासपीठाकडे घेऊन जाताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, अभेद्य जैन व सहकारी

(_RTM1178) – ऋषभराजाचे विधीवत पूजन करताना सौ. ज्योती जैन, श्री. अशोक जैन व मान्यवर

(_LDH6572) – भुमिपूत्राचा परिवारासह सन्मान करताना सौ. शोभना जैन, सौ. ज्योती जैन, श्री. अशोक जैन.

(_LDH6321) – जैन हिल्स येथे पोळा सणाच्या निमित्ताने तालवाद्यांवर ठेका धरताना ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार.

Wednesday, 24 August 2022

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

*भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर*

*कांताई जैन साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार प्रभाकर कोलतेंना;*

*बालकवी ठोमरे, बहिणाई चौधरी व ना. धों महानोर पुरस्कारही जाहीर*

*जळगाव, दि. 24 (प्रतिनिधी)* – जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना जाहीर झाला आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.

कान्हदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, सौ. ज्योती जैन यांची उपस्थिती होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. 'भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन' व 'बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट' यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.

जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा दुसरा पुरस्कार जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना जाहीर झाला आहे.

*कोट..*

बृहृन्महाराष्ट्रातील श्रेष्ठ लेखकांच्या निवड समितीने एकमताने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसतात.

-    *डॉ. भालचंद्र नेमाडे*, अध्यक्ष, निवड समिती

*कोट..*

कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहातर्फे सुरूच असते. बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला-साहित्य पुरस्कार जाहिर करताना आनंद होत आहे.
-    *अशोक जैन*, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन

*परिचय*

1)       *प्रभाकर कोलते* - 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' ज्यांना जाहीर ते प्रभाकर कोलते मुंबई येथील जे.जे. कला महाविद्यालयात कलाशिक्षण घेऊन तेथेच हाडाचे प्राध्यापक होते. प्रभाकर कोलते कला शिक्षणाविषयी आपलं मत अतिशय प्रभावीपणे आणि स्पष्ट मांडतात त्यामुळेच ते कला विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. भारतीय अमूर्त कलेतील सध्याच्या नामांकित चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलतेंचे नाव अग्रस्थानी आहे. अमूर्त कलेवर भाष्य करणारे आणि लिहीणाऱ्या अतिशय दुर्मिळ जागतिक दर्जाच्या चित्रकारांमध्येही ते पुढे आहेत. भारतीय अमूर्त कलेमध्ये काम करणाऱ्या क्रियाशील पिढीमध्ये बहूतांश चित्रकारांवर प्रभाकर कोलते यांचा प्रभाव आहे. संत परंपरेचा अभ्यास करून अमूर्ततेतील अध्यात्म सांगणारा योगी चित्रकार म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या अनेक चित्रमालिका देशात-परदेशात गाजलेल्या आहेत.

2)       *संध्या नरे-पवार* -  श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी संध्या नरे-पवार यांची निवड झाली. मुक्तपत्रकार व संधोधनपर लेखनामध्ये त्यांचे साहित्य आहे. आदिवासी स्त्रीयांविषयी संवेदनशील वास्तव मांडून अमानवी प्रथांवर प्रखड भाष्य करणारे ‘डाकीण’, ‘तिची भाकरी कोणी चोरली’ या पुस्तकांसह त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
3)       *प्रवीण दशरथ बांदेकर* – सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज येथे इंग्रजीचे अध्यापन करतात. त्यांनी कविता, कादंबरी, ललित, समीक्षा आदी लेखन केले असून कविता संग्रह – ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं...’, ‘चिनभिन’, कादंबऱ्या – ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘इंडियन अॅनिमल फार्म’, ललित लेख संग्रह – ‘घुंगुरकाठी’,  ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’, बालसाहित्य- ‘चिंटू चुळबुळे’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे.
4)       *वर्जेश सोलंकी* - वर्जेश सोलंकी हे आगाशी ह्या लहानशा खेड्यात वास्तव्यास असून महाविद्यालय जीवनापासून काव्यलेखनाला त्यांनी सुरूवात केली. वर्जेश ईश्वरलाल सोलंकींच्या ‘कविता’, ‘ततपप’, ‘वेरविखेर’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध, ‘दीडदमडीना’ (ललितगद्य), ‘पेरूगन मुरूगन’ (लघुकांदबरी), ‘वृद्धशतक’  व ‘अनेक एक’ (कवी कमल वोरा ह्यांच्या गुजराती कवितांचा मराठी अनुवाद), ‘हुसैनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ (कथासंग्रह) इत्यादी साहित्य प्रकाशित असून अनेक कविता व कवितासंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश आहे.

*फोटो कॅप्शन (_RTM0556)* – भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य-कला पुरस्कार निवडप्रसंगी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, सौ. ज्योती जैन.

Tuesday, 23 August 2022

आदित्य ठाकरेंचा दौरा आणि महागडे शौच..

नुकतंच आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा संपन्न झाला,त्यावेळी जागोजागी गर्दी झाल्याचे चित्र दिसले.धरणगावात वर्दळी च्या मुख्य चौकात हजारो ची गर्दी झाली होती मात्र अंदाजे 2,3 तास थांबून असलेल्या कार्यकर्त्यांना तसेच काही लोकांना जोरात लागली होती.अशावेळी काहींनी जवळ असलेल्या धरणगाव बस स्टँड येथील (अ)सुलभ शौचालया ला 'अनिच्छेने' सदिच्छा भेट दिली असता,तब्बल 10 रु.प्रति शौच अशी महागडी हागणखडी पाहून अनेकांनी आपल्या 'वेदना दाबत' इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे सदर शौचालय हे कुठल्या 'सुविधांचे' एवढे 10 रु मोजत होते हे अनाकलनीय होय.घाणीचे साम्राज्य पाहून आलेली शौच परत जावी अशी परिस्थिती होय,दारांना कडी नाही (कुणी येऊ नये म्हणुन गाणी गावी लागतात),साबण लपवून ठेवलेला असतो,महिला आणि पुरुष साठी एकच 'पुरुष' व्यक्ती पैसे गोळा करतो (आत मध्ये) त्या मुळे महिला भगिनी यांना लज्जा उत्पन्न होते.

धरणगाव ही सर्व प्रकारच्या गुलाबांची बाग आहे,गुलाबराव पाटील,गुलाबराव देवकर,गुलाबराव वाघ,गुलाबराव महाजन,गुलाबराव माळी,गुलाब तडवी,गुलाब पिजारी,असे अनेक गुलाब दरवळत असताना 'जुलाब' झालेल्या काही नागरिकांना विशेषतः बस प्रवास करणाऱ्याना धरनगावतील हे शौचालय भलतंच 'महाग' झालंय,प्रश्न उपस्थित होत आहे की आता गरिब माणसाने शौचालाही जायचे की नाही? सहन होत नाही,सांगता येत नाही,आणि दाखवता बिलकुल येत नाही....