Tuesday, 26 August 2025

*शिक्षण फक्त पदव्या नव्हे तर जाणीवेची ओळख आहे* – डॉ. अब्दुलकरीम सालार

*शिक्षण फक्त पदव्या नव्हे तर जाणीवेची ओळख आहे* – डॉ. अब्दुलकरीम सालार
बुरहानपूर प्रतिनिधी:
मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी, बुरहानपूर व ऑल इंडिया उर्दू संपर्क समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, २४ ऑगस्ट रोजी एका भव्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रांताध्यक्ष सय्यद आरिफ अज़ीज यांनी भूषविले.

या सोहळ्यात बुरहानपूरातील एकूण १०५ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला इमरान खान (मुंबई), नियाज अहमद (सतना), मुश्ताक मलिक (सनावद), लुकमान मसूद (खंडवा), मुइत खान, सफियान काझी (खंडवा), विनोद गोर (सनावद), हाजी वाजिद इकबाल, अजय रघुवंशी, मुशर्रफ खान, हामिदुल्ला डायमंड, फहीम हाशमी, मुश्ताक भाई जलेबीवाले, सलीम मास्टर, फजलुर्रहमान व इजाज अशरफी यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

समारंभाचे प्रमुख आकर्षण होते खानदेशातील आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉ. अब्दुलकरीम सालार (अध्यक्ष – इक़रा एज्युकेशन सोसायटी, जळगाव). त्यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात सध्याच्या शैक्षणिक स्थितीवर प्रकाश टाकत मुस्लिम समाजाच्या अधोगतीवर भाष्य केले. यशस्वी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी म्हटले – “शिक्षण फक्त पदव्या नव्हे, तर जाणीवेची ओळख आहे. समाज आज शिक्षण घेतलेल्या पण कृतीशून्य लोकांनी भरला आहे. खरी पदवी तीच जी कृतीतून दिसते.”

तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे आवाहन केले व सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसूद रियाज, अता उल्ला खान, सुहैल अहमद, अझहर हुसेन, हिकमत मुकादम, अकबर पठाण, इकबाल कौसिन, अफसर अली, तन्वीर अली आदींनी मोलाचे योगदान दिले.
समारंभाचे आयोजन मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी बुरहानपूर जिल्हाध्यक्ष सय्यद जौझर अली यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. माजी आमदार अब्दुल हमीद काझी व फरीद सेठ यांचे मार्गदर्शन व आश्रय कार्यक्रमाला लाभले.

Thursday, 14 August 2025

सुलेमान मोबलिंचिंग--स्वातंत्र्यदिनी मुस्लिम समाजाने घातला पालकमंत्रीना घेराव. SIT ची मागणी.

*जामनेर : बेटावद खुर्द मॉब लिंचिंग – मुख्य आरोपींना तात्काळ अटक, मकोका  सह संगनमत कलम लावा व पीडिताच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची एकता संघटनेची मागणी*
*एस आय टी व संगनमत कलम वाढविणार: पोलिस अधीक्षक* 

जळगाव :
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे ११ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या अमानवी मॉब लिंचिंग प्रकरणातील मुख्य आरोपी, जो राजकीय प्रभावाचा मानला जातो, याला अद्याप अटक न झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मुख्य आरोपी व कॅफे चालक यांना तात्काळ अटक, गुन्ह्यात संगनमत सह मकोका लावून आणि फिर्यादीच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी केली आहे. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी,  जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांची सुद्धा उपस्थिती होती.

या हल्ल्यात पीडित व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून हत्या करण्यात आली.
एकता संघटनेचे शेख यांनी स्पष्ट केले की आरोपी हा संघटित टोळीचा भाग असून, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचा इतिहास आहे. त्यामुळे मकोका व बी एन एस ६१(२) संगनमत हे कलम लाऊन  कठोर कारवाई केल्याशिवाय न्याय होणार नाही.
*एकता संघटनेच्या ठाम मागण्या*


मुख्य आरोपी व कॅफेचालक यांना तात्काळ अटक.

भा.दं.सं. कलम १२०(ब) म्हणजे बी एन एस 61(2) अंतर्गत कटकारस्थानाचा गुन्हा दाखल करा.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) तात्काळ लागू करणे.
तपास त्वरित एस आय टी कडे सोपवणे.

पीडित कुटुंबास २५ लाख रुपयांची मदत व एक सदस्यास शासकीय नोकरी.

साक्षीदार संरक्षण योजना तात्काळ लागू करणे.

सी आर पी सी कलम २४(८) अंतर्गत पीडिताच्या निवडीनुसार विशेष सरकारी वकील नेमणे

संघटनेने आपल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सह दाखले दिलेले आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने, कठोर कायदेशीर कारवाई व निष्पक्ष तपास अत्यावश्यक आहे.

या प्रसंगी संघटनेचे मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगर, मजहर पठाण,आरिफ देशमुख, अब्दुल अजीम शेख, मौलाना इमरान, रज्जाक पटेल, मौलाना कासिम नदवी , खान शकील,अरबाज शेख, इरफान शेख, हसन सैयद, उमर पटेल, नजमोद्दीन शेख, गुफरान शेख,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर निवेदनाच्या प्रती मा. गृहमंत्री, मा. आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मा. अल्पसंख्यांक आयोग, मा. मानव अधिकार आयोग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आलेले आहे. 
फोटो कॅप्शन 
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करताना फारुक शेख व निवेदन देताना मुफ्ती खालीद सह शिष्टमंडळ दिसत आहे

Wednesday, 6 August 2025

*अनामिका मेहरा सहित जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित*

*अनामिका मेहरा सहित जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित*

उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्यानगर जळगाव येथील असून सर्व तीनही  भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. 
परंतू  मा.  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार उत्तरकाशी येथील Maount Bhagirathi Home Stay Harshil
या स्टे हाऊस शी जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क केला असता सदर  *मेहरा कुटुंबातील* अनामिका मेहरा .आरोही मेहरा,रुपेश मेहरा –  हे उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक  अयोध्या नगर जळगाव येथील असून सर्व तीनही  भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. 
     सदर भाविकांचे वडील श्री चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कशात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.

सूत्र - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जळगाव

Thursday, 24 July 2025

एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेतून मोहाडी टेकडीवर ५ हजार झाडांचे वृक्षारोपण..ऑक्सिजन पार्क निर्मितीचा संकल्प; २ लाख देशी बीजांची होणार पेरणी..

‘एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेतून मोहाडी टेकडीवर ५ हजार झाडांचे वृक्षारोपण..ऑक्सिजन पार्क निर्मितीचा संकल्प; २ लाख देशी बीजांची होणार पेरणी..

जळगाव :आईच्या मायेप्रमाणे झाडे लावा, निसर्ग जपा या भावनेतून ‘एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोहाडी गावाजवळील टेकडीवर ५,००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

पर्यावरण प्रेमी डॉ. नितीन महाजन (अप्पर जिल्हाधिकारी, अलिबाग) उद्योजक सुबोध कुमार चौधरी (संचालक सुबोनियो केमिकल्स लिमिटेड) उद्योजक अश्विन राणे यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून भव्य वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी टेकडीवर तब्बल ५००० वृक्षांचे रोपण आणि २ लाख देशी वृक्षांच्या बिया टाकण्याचे काम करण्यात येणार असून हा कार्यक्रम २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे या जाणिवेतून "वृक्षसंपदेचा ध्यास" घेत मराठी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये करंज, कांचन, जांभूळ, शीसम, फापडा, धावडा, रेन ट्री, कदंब, उंबर, गुलमोहर, मोह, गोरख चिंच, चिंच, बेहडा, बांबू, वड, हादगा इत्यादी देशी वृक्षांचा समावेश आहे. हे वृक्ष मान्यवरांच्या हस्ते लावण्यात येणार आहेत.

कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून त्यात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे व आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, प्रांताधिकारी विनय गोसावी, कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, तहसीलदार डॉ. शितल राजपूत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, सुबोनियो केमिकल्स लिमिटेड चे संचालक सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सुमोल चौधरी, डॉ. सृष्टी चौधरी, उद्योजिका सौंदर्या महाडिक पुणे, संजना चौधरी सनशाइन अग्रोचे हर्ष चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, आर एम पाटील सहाय्यक आयुक्त नगररचना, वनविभागाचे जमीर शेख, नितीन बोरकर व समाधान सोनवणे, आदींचा समावेश आहे.

या वेळी मोहाडी टेकडी परिसरात दोन लाख देशी वृक्षांच्या बीजांची पेरणी करून भविष्यात ‘ऑक्सिजन पार्क’ निर्माण करण्याचा संकल्पही करण्यात येणार आहे.

मराठी प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असून, "एक वृक्ष आईच्या नावे" ही संकल्पना पर्यावरण आणि भावनिक जाणीवा यांचा अनोखा संगम ठरणार आहे.

या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाला शहरातील सर्व वृक्षप्रेमींनी, निसर्गप्रेमींनी, सामाजिक संस्थांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी केले आहे.


Thursday, 10 July 2025

IMA चा उद्या चा संप तूर्त रद्द, मुख्यमंत्री यांनी मिटिंग लावण्याचा सकारात्मक शब्द दिल्याने संप स्थगित...


IMA तर्फे जारी अधिकृत संदेश 👇🏼

"उद्याच्या स्ट्राइकचा निर्णय पुढे ढकलला गेला आहे. फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर थोड्या वेळापूर्वी मीटिंग झाली त्यात त्यांनी उद्या सकाळी अर्जंट मध्ये एम एम सी विषयी मीटिंग ठेवलेली आहे . तेथे निर्णय होईल... त्यानुसार आमच्या निर्णयाची दिशा ठरेल."

Tuesday, 8 July 2025

*जिओ 500 रुपयात 100 दिवस अनलिमिटेड हायस्पीड वायफाय फ्री... इंस्टालेशन फ्री*


*जिओ 500 रुपयात 100 दिवस अनलिमिटेड हायस्पीड वायफाय फ्री... इंस्टालेशन फ्री*

*जिओ वाय फाय ची फ्री स्किम मस्त, पण कर्मचारी भलतेच "सुस्त"... जळगाव येथील जिओ कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सुस्तपणा ग्राहकांना तापदायक...*


जळगाव - येथील देशमुख नगर मधील एका ग्राहकाला जिओ सेवा कर्मचाऱ्यांचा असमाधानकारक अनुभव आला आहे.प्रस्थापित कंपन्याना 'नॉक आऊट' करणाऱ्या योजना रिलायन्स - जिओ वाले आणत असतात. त्यांची योजना पाहून अनेक ग्राहक हे मागिल कंपनी सोडून थेट जिओ ला पसंती देत असतात. मात्र स्थानिक कर्मचारी अधिकारी यांची अनास्था जिओ ला मारक ठरत आहे. जिओ तो आलिशान है मगर आलसी कर्मचारीयो से परेशान है.


देशमुख नगर, जळगाव येथील एका ग्राहकाने साधारण 12 दिवसा पूर्वी जिओ वायफाय साठी आवेदन गेले होते,ग्राहकाने सुरवातीला 350 रु. सुद्धा भरले, सोबतच 500 भरले मात्र 24 किंवा 48 तासामध्ये मोफत वायफाय इन्स्टोल करून देऊ हे दावे मात्र सपशेल फोल ठरले असून, तांत्रिक कारणाने ग्राहकाला 500 रु ऑनलाईन परत पाठवले, मात्र मागील 12 दिवसापासून टाळा टाळ, तांत्रिक कारणे, जबाबदारी ढकला ढकल, आळस,पाठपुरावा न करने,अनास्था, कर्मचारी अधिकारी समन्वयाचा अभाव, कष्ट-टाळू वृत्ती या सर्वामुळे तब्बल 12 दिवसा नंतर सुद्धा वाय फाय लागायचा पत्ता नाही. यामुळे ग्राहकांना उगाच मनस्ताप होत असून मागची कंपनीच चांगली होती अशी भावना व्यक्त होत आहे.संबधित ग्राहक आता 'योग्य' त्या मार्गाने पत्रकार परिषद, ऑनलाईन कम्प्लेंट, ग्राहक मंच किंवा जिओ ची उच्चस्तरीय मॅनेजमेंट कडे प्रयत्न करणार आहे.

Monday, 7 July 2025

*IMA ने पुकारला 11 जुलै रोजी बंद"*

*IMA ने पुकारला 11 जुलै रोजी बंद"*
रिपोर्ट अयाज मोहसीन.
(इंडिया 365 न्यूज)

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निर्णयाविरोधात IMA महाराष्ट्र राज्याचे तीव्र आंदोलन

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा तीव्र निषेध केला आहे. या अधिसूचनेनुसार, केवळ एक वर्षाचा Certificate Course in Modern Pharmacology (CCMP) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे.

हा निर्णय संपूर्ण आधुनिक वैद्यकीय क्षेत्रासाठी धोकादायक असून, डॉक्टरांच्या दीर्घकालीन शिक्षण व नैतिकतेचा अवमान करणारा आहे.

या पार्श्वभूमीवर दिनांक ६ जुलै २०२५ रोजी IMA महाराष्ट्र राज्याची विशेष कार्यकारिणी बैठक मुंबई वेस्ट शाखेत आयोजित करण्यात आली होती. MARD, AMC, MAGMO आणि विविध IMA शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सखोल चर्चा केल्यानंतर खालील आंदोलनात्मक कृती योजना जाहीर करण्यात आली:


🔹 १. निवेदन सादरीकरण – ८ जुलै २०२५ (मंगळवार)

राज्यातील सर्व IMA शाखा आपापल्या जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करतील.
स्थानिक स्पेशालिटी संघटनांचे सदस्यही सहभागी होतील.
प्रत्येक शाखेत पत्रकार परिषद घेऊन ह्या विषयाची जनजागृती करण्यात येईल.


🔹 २. एकदिवसीय आरोग्य सेवा बंद – ११ जुलै २०२५ (शुक्रवार)

🕗 सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ पर्यंत (२४ तास)
राज्यभरातील सर्व वैद्यकीय सेवा (जीवनरक्षक आपत्कालीन सेवा वगळून) पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील.
ही शांततामय कृती वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा व रुग्णांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे.


🔹 ३. “चलो मुंबई” भव्य रॅली – १९ जुलै २०२५ (शनिवार)

मुंबईत एक भव्य रॅली आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यभरातील IMA शाखांनी प्रतिनिधी पाठवावेत.
रॅलीचे ठिकाण, वेळ व वाहतूक यासंदर्भातील माहिती लवकरच दिली जाईल.


IMA महाराष्ट्र राज्याने स्पष्ट केले आहे की आधुनिक वैद्यक आणि होमिओपॅथी या दोन स्वतंत्र वैद्यकीय प्रणाली आहेत. एक वर्षाच्या कोर्सद्वारे होणारे क्रॉस-नोंदणीकरण हे डॉक्टरांच्या प्रशिक्षणाचा अपमान असून रुग्णांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करणारे आहे.

महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा संपूर्ण राज्यभरात तीव्र व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल.
जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी प्रसिद्ध केलेले
– इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्य
✊ एकत्र आलो, म्हणून सक्षम झालो!
जय IMA!