*मंगळवारी मंत्रिमंडळ मंगळ होणार..*
*जळगाव जिल्ह्याला 3 तब्बल 3 मंत्रिपदे?*
*गिरिश भाऊ,गुलाब भाऊ निश्चित...किशोर अप्पाना धावपळी चे बक्षिस मिळणार?*
ब्लॉग "इंडिया365लाईव्ह"--अयाज मोहसिन✒️
विविध कारणांमुळे वारंवार प्रलंबित होणारा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी संपन्न होणार असे दिसतंय त्याला कारण आहेत संभव मंत्रिमंडळ मधिल गिरीश महाजन,गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील यांना मुंबई येथे मंगळवारी उपस्थित राहण्याचे 'खास' फोन.अनुभव आणि वरिष्ठता लक्षात घेता माजीमंत्री गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास निश्चित समजले जात आहे,किंबहुना दोन्ही माजीमंत्री यांना त्यांचे जुणेच खाते परत मिळण्याची खूप मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे.सोमवारी सायंकाळी जळगाव शहरात आणि जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असतांना भावी मंत्र्यांच्या समर्थकांनी मात्र आनंदाची आंघोळ घातली आहे.विशेषतः पाचोरा येथील आमदार किशोर अप्पा पाटील यांना आलेल्या 'सूचक' फोन नंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारे हास्य ,लपवून ही लपत नव्हते.त्याला कारण आहे अप्पा यांचे नामदार शिंदे यांच्याशी असलेले निकटवर्तीय संबंध.निदान राज्यमंत्रीपद तरी जवळपास शक्य आहे.
एकूणच जळगाव जिल्ह्यातील जनतेला आगामी काळात कदाचित एकसोबत 3 मंत्रिपदे पाहण्याचे योग येऊ शकतात,मात्र तेवढा विकास सुध्दा व्हावा या माफक आणि रास्त अपेक्षा.
No comments:
Post a Comment