Monday, 15 June 2026

सर्व पक्षात स्नेहील संबंध असणारेनंदूभाऊ महाजन : जनमानसात रुजलेलं अभ्यासू नेतृत्व, विधानपरिषदेसाठी सज्ज!

सर्व पक्षात स्नेहील संबंध असणारे
नंदूभाऊ महाजन : जनमानसात रुजलेलं अभ्यासू नेतृत्व, विधानपरिषदेसाठी सज्ज!
जळगाव: आजच्या बदलत्या राजकीय पटलावर सत्तेसाठी वारंवार भूमिका आणि पक्ष बदलणारे नेते जळगाव जिल्ह्याने पाहिले आहेत. अशा अस्थिर राजकीय वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत असताना, आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून एकच पक्ष आणि एकच झेंडा सोबत ठेवणारे प्रामाणिक नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. विधानपरिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, यंदाची लढाई महायुतीच्या भक्कम साथीने सोपी झाली असल्याचे चित्र आहे. तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा 'आमदार' पदाचा बहुमान नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या चर्चेवर आता जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब होत आहे.

*स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकीची जपणूक*
 आजच्या राजकारणात शब्द आणि कृती यात मोठी दरी पाहायला मिळते. मात्र, नंदूभाऊ महाजन याला अपवाद आहेत. जे मनात तेच ओठावर, हा त्यांचा स्वभाव असून जनतेच्या प्रश्नांवर किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी बोलताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. निवडणुकीच्या काळात अनेकदा समाजात जातीपातीचे राजकारण केले जाते. परंतु, नंदूभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनात कधीही जाती-पातीच्या चौकटी स्वीकारल्या नाहीत. त्यांच्या मते, 'माणुसकी' हाच एकमेव धर्म आणि 'माणूस' हीच एकमेव जात आहे.

*शेतकरी समाजासाठी आशेचा नवा किरण*
नंदूभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण विकासाची कास धरली. त्यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या कार्यकाळात सर्व सहकारी सदस्यांचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी राहिले. तापी, पूर्णा आणि गिरणाकाठच्या शेतकरी समाजासाठी ते आता आशेचा नवा किरण ठरत आहेत. मतदारसंघामध्ये आमदारकीसाठीजी कोणी नेता नव्हे, तर एक कुटुंबप्रमुखच निवडणूक लढवत असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे.

*महायुतीची भक्कम साथ; विक्रमी विजयाचा विश्वास*
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्षांना जनतेचा प्रचंड कौल मिळाला असल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. गेल्या २५ वर्षांतील त्यांची सर्वसमावेशक छबी ही त्यांची जमेची बाजू आहे.


"पक्ष दोन नव्हे चार डोळ्यांनी पाहत असतो, हे नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर मांडलेले निरीक्षण तंतोतंत खरे आहे. महायुतीतील सर्व मतदार-लोकप्रतिनिधी आपली पक्षनिष्ठा व महायुतीचा धर्म नक्की निभावतील आणि हा विजय ऐतिहासिक असेल."
— चंद्रकांत बाविस्कर (जिल्हाध्यक्ष, भाजपा)

*पहिल्यांदाच खरा शेतकरी विधानपरिषदेची पायरी चढणार!*
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत व्यापारी किंवा बड्या नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तीलाच आमदारकीची संधी मिळत आल्याचा इतिहास आहे. मात्र, विधानपरिषद हे कायदे करणारे वरिष्ठ सभागृह असल्याने तिथे अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व जाणे गरजेचे आहे.
यंदा नंदूभाऊंच्या रूपाने खऱ्या अर्थाने जमिनीशी जोडलेला शेतकरी आणि ग्रामीण-नागरी प्रश्नांची उत्तम जाण असणारा लोकनेता सभागृहात पोहोचणार असल्याने, जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावी आवाज मिळेल, असा ठाम विश्वास जिल्हाभरातून व्यक्त केला जात आहे.

जळगावात भाजपाचा व्हीप जारी,नंदकिशोर महाजन यांनाच प्रथम पसंतीचे मत देण्याचे निर्देश!

जळगावात भाजपाचा व्हीप जारी
नंदकिशोर महाजन यांनाच प्रथम पसंतीचे मत देण्याचे निर्देश!
​महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि गटनेते प्रकाश बालानी यांचे पत्र; सर्व नगरसेवकांना पक्षशिस्तीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश

​जळगाव:
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या वतीने अधिकृत व्हीप (पक्षदेश) जारी करण्यात आला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांच्या विजयासाठी पक्षशिस्त आणि एकजूट कायम राखत सर्व नगरसेवकांनी त्यांनाच प्रथम पसंतीचे मत द्यावे, असे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत.

​दिनांक १८ जून २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वतयारीसाठी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आणि नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान पद्धती आणि पक्षाच्या धोरणात्मक भूमिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

*​पसंती क्रमांक '१' महाजनांसमोरच नोंदवा!*

​बैठकीत नगरसेवकांना मार्गदर्शन करताना, महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनाच प्रथम पसंतीचे मत देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मतदान करताना मतपत्रिकेवर पसंती क्रमांक १ हा नंदकिशोर महाजन यांच्या नावासमोरच नोंदवावा, तसेच मत अवैध ठरणार नाही यासाठी कोणती तांत्रिक खबरदारी घ्यावी आणि निवडणूक आयोगाच्या कोणत्या नियमांचे पालन करावे, याचे सविस्तर प्रशिक्षण या वेळी लोकप्रतिनिधींना देण्यात आले.

*​पक्षादेश बंधनकारक; गटनेते आणि महानगराध्यक्षांचे पत्र*
​भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि मनपा गटनेते प्रकाश बालानी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हा व्हीप जारी करण्यात आला आहे. पक्षाचा हा आदेश सर्व सदस्यांवर कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या बंधनकारक असून, याचे काटेकोर पालन करावे असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महायुतीची एकजूट दाखवून देत महाजन यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी गटनेत्यांनी केले.
*​नगरसेवकांचा विजयाचा निर्धार*
​या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेचे स्वागत करत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही सर्व लोकप्रतिनिधींनी या वेळी सामूहिकपणे व्यक्त केला.

Wednesday, 3 June 2026

*भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवाद' या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान*

*भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवाद' या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे जाहीर व्याख्यान* 


> व्याख्यान ६ जुन रोजी सायंकाळी ६.०० वा. छत्रपती संभाजी सभागृहात होणार असुन सकल हिंदु समाजाला उपस्थितीचे आवाहन. ॲड. अनिकेत निकम हे देखील याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आज संपूर्ण भारतातील हिंदू समाज श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या विचारांनी प्रभावित आहे. देशात हिंदू मध्ये जनजागृती घडवून भविष्यात आपली संस्कृती, प्राचीन धरोहर, सनातन धर्म आणि राष्ट्र सुरक्षित ठेवणे याकरिता त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. सकल हिंदूंमध्ये हिंदुत्वाचे विचार रुजवणारे एक श्रेष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. जळगावकरांना त्यांच्या या ओघवत्या आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित करणाऱ्या विचारांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी या व्याख्यानाच्या माध्यमातून मिळणार आहे.
व्याख्यानाचे आयोजन बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगांव यांनी केले आहे. 
*व्याख्यान सर्व हिंदूंसाठी खुला; पासेसची आवश्यकता नाही* आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्याख्यानासाठी कोणत्याही प्रकारच्या पासेस छापण्यात आलेल्या नाहीत. हे व्याख्यान संपूर्ण हिंदू समाज, माता-भगिनी आणि तरुणांसाठी पूर्णपणे खुले आहे. सभागृहातील पहिल्या तीन रांगा प्रायोजकांसाठी राखीव असतील, तर उर्वरित संपूर्ण सभागृह अनारक्षित आहे. त्यामुळे 'आधी येणाऱ्यास आधी प्राधान्य' (First Come, First Served) या तत्त्वावर नागरिकांना आसनव्यवस्था मिळणार आहे.

*आयोजक आणि प्रायोजक:*
'बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव' ही ज्ञाती संस्था असली तरी राष्ट्रीय विचार आणि हिंदुत्वाच्या प्रचार-प्रसारासाठी ती सदैव समर्पित राहून कार्य करते. या भव्य कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ॲड. ओम त्रिवेदी, श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली., आर्की. नितीन पारगावकर, संजय व्यास, नंदलाल अडवाणी आणि सपन झुनझुनवाला यांचे सहकार्य लाभत आहे.

*उपस्थित राहण्याचे आवाहन:*
या व्याख्यानातून जळगावकरांमध्ये एक नवी राष्ट्रीय ऊर्जा निर्माण होणार आहे. तरी जळगाव शहरातील व परिसरातील सकल हिंदू बांधव, माता-भगिनी आणि युवा पिढीने आपल्या कुटुंबासह व मित्रपरिवारासह या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक *'बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव'* यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, 18 May 2026

बक्राईद का त्योहार, पुलिस की भूमिका जाहिर...

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित मुस्लिम नागरिक, विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आयोजित करण्यात आली.

या बैठकीस पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभाग, महावितरण, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये बकरी ईद सण शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या तसेच त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

पोलीस प्रशासनातर्फे शहर व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एसआरपीएफ जवान तसेच होमगार्ड पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत असून प्रमुख चौक, धार्मिक स्थळे व गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच “गुड मॉर्निंग स्क्वॉड” अलर्ट करण्यात आला असून समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक नाके सक्रिय करण्यात आले असून संशयित वाहनांची व व्यक्तींची तपासणी सुरू आहे. सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बैठकीमध्ये शासनाच्या नियमांनुसार गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती देण्यात आली. गोवंश हत्या कायद्याने गुन्हा असून कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला.

मुस्लिम नागरिकांना पोलिसांतर्फे खालील सूचना देण्यात आल्या :
• गोवंश हत्या कायद्याने गुन्हा आहे.
• ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तसेच गरोदर जनावरांची कत्तल करू नये.
• उघड्यावर कत्तल अथवा मांस विक्री करू नये.
• टॅग केलेल्या जनावरांचीच कत्तल करावी.

महानगरपालिकेस खालील सूचना देण्यात आल्या :
• जास्तीत जास्त ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात यावी.
• ट्रॅक्टरला खालून व वरून काळे मेणकापड लावण्यात यावे.
• परिसरानुसार ट्रॅक्टरची फ्रीक्वेन्सी वाढविण्यात यावी.
• ट्रॅक्टरसाठी जबाबदार व प्रशिक्षित चालक नियुक्त करण्यात यावेत.
• पाण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.
• कुठेही रक्त वाहून जाणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी.

तसेच नागरिकांनी शांतता, सलोखा व परस्पर सौहार्द कायम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

— जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन

Saturday, 16 May 2026

नामदार गिरीश भाऊंचा बंपर महाधमाका .. अबब 4 हजार कोटी?

*वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून गिरणा खोऱ्यासाठी जलसिंचनाचे मोठे गिफ्ट, उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल ४ हजार ११६ कोटींच्या कामाला सुरुवात होणार* :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
----------------------------------
नाशिक :(दि.१६/०५/२०२७) अनेक दशकांपासून पाणीटंचाई, अनियमित पाऊस आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर जारी करत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला हिरवा कंदील दिला आहे.
गिरणा खोरे प्रकल्प विभाग, नाशिक यांच्या माध्यमातून मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) आणि आयसीसी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाला हे काम देण्यात आले आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
नार-पार-गिरणा प्रकल्पाची मूळ संकल्पना म्हणजे कोकण पट्ट्यातील आणि पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी वळवून ते दुष्काळी गिरणा नदी खोऱ्यात आणणे. सुरगाणा, पेठ आणि परिसरातील नदी खोऱ्यांमधील पाणी विविध धरणे, पंपिंग स्टेशन, बोगदे आणि पाइपलाइनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात पोहोचवले जाणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या नऊ ठिकाणी धरणांची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय माणखेड आणि सालभोये येथे मोठे जलसाठे उभारण्यात येणार असून अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो-मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचे जाळे तयार होणार आहे. गिरणा खोऱ्याकडे पाणी वळवण्यासाठी विशेष बोगदेही उभारले जाणार आहेत.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील  हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळू शकतो. विशेषतः नाशिक, जळगाव आणि धुळे परिसरातील कोरडवाहू शेतीला मोठा आधार मिळणार असून कृषी उत्पादन वाढीस चालना मिळेल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत या प्रकल्पावर पर्यावरणीय मंजुरी, वनक्षेत्र, जमीन संपादन, आदिवासी भागातील पुनर्वसन आणि खर्चवाढ यांसारख्या मुद्द्यांवर मोठी चर्चा झाली होती. मात्र राज्य शासनाने प्रकल्पाला प्राधान्य देत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
--------------------------------
" *हवामान बदल, घटते भूजल आणि वाढती पाण्याची मागणी या पार्श्वभूमीवर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा केवळ सिंचन प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यातील जलसुरक्षेचा आधारस्तंभ ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल. राज्याचे  लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांचे दूरदृष्टी व नियोजनातून हा प्रकल्प साकार होणार आहे* ". :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. 
------------------------------------

Friday, 24 April 2026

*JCL --चमत्कारानंतर लगेच महाचमत्कार घडला..*

*JCL --चमत्कारानंतर लगेच महाचमत्कार घडला..*

*इतिहास घडला,महाविक्रम लगेच इतिहास (जमा) झाला..*

*२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…*

*दुसरा संघ आज ठरणार.. ओम भोसलेची १७० धावांची स्फोटक खेळी ठरली व्यर्थ*

*जळगाव दि. २४ प्रतिनिधी* - जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटच्या रविवारी होणाऱ्या ग्रॅण्ड फायनल साठी पहिल्या क्वालिफायर मधून विजयी होत जळगाव कोगटा किंग च्या २४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटस ने थाटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा सुरू असलेल्या एलिमिनेटर सामन्यातून दुसरा क्वालिफायर साठी संघ ठरेल. दुसरी क्वालिफायर उद्या दि. २५ एप्रिल दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस या  भव्य क्रीडांगणावर होईल.
अमळनेर सुहांस जायंटस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव कोगटा किंग्स संघाच्या फलंदाजीनी हा निर्णय पूर्णपणे फोल ठरविला. ओम भोसले याने सुरवातीच्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत १० उत्तुंग षटकार व १७ चौकारांच्या मदतीने ७४ चेंडूंमध्ये १७० धावांची नाबाद स्फोटक खेळी खेळली.  त्याच्यासोबत अक्षय मेघानी  २१ धावा (१६ चेंडू), जितेंद्र नाईक २० धावा (१५ चेंडू), बिपिन चांगरे १३ धावा (११ चेंडू), पुर्वेश चौधरी ८ धावा (नाबाद) यांनी योगदान दिले. निर्धारीत २० षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात २४२ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला.  शुभम शर्मा च्या अचूक थ्रो ने जितेंद्र नाईक याला धावचीत केले. अमळनेर सुहांस जायंट संघातील केशव ठाकूर या गोलदांजाने ४ षटकांमध्ये दोन बळी घेतले. त्याच्या व्यतिरीक्त सर्व गोलंदाजांची पिटाई झाली.
धारदार प्रतिकार करत अमळनेर सुहांस जायंटसच्या फलंदाजांनी केवळ १८.३ षटकांत ३ गडी गमावत २४६ धावा करुन विशाल लक्ष्य गाठले.  रिषी यादव २६ (१७ चेंडू), मानव ट्रिबरेवाल २९ चेंडू ६ षटकार व ४ चौकारच्या मदतीने ६४ धावा करत विजयाचा पाया रचला. त्यावर रणजीत निकम व कर्णधार शुभम शर्मा यांच्या तेजतर्रार महत्त्वपूर्ण भागीदारीने हे लक्ष्य सहज पार केले. रणजीत निकम ने २८ चेंडूत ५ षटकार व ७ चौकार लगावत ७६ धावा केल्यात. तर शुभम शर्मा ने आक्रमक खेळी करत ३ षटकार ७ चौकार खेचून केवळ ३० चेंडूत ६५ धावा केल्यात. जळगाव कोगटा किंग्स चे कर्णधार जगदीश झोपे ने २ गडी बाद केले तर ३ षटकांत ५२ धावा देत राज बेलदारने १ गडी बाद केला. रणजीत निकम याला सामनावीर म्हणून पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी नितीन रेदासनी, जितेंद्र कोठारी आदी मान्यवर उपस्थीत होते.

Thursday, 23 April 2026

*चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स स्पर्धे बाहेर*

 *चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स स्पर्धे बाहेर* 


जळगाव, दि.23 (प्रतिनिधी) -
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेट स्पर्धेत आज पाचव्या दिवशी अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाने विजय मिळविला तर रावेर रॉयल्स मात्र सामन्यातून बाद झाला. सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरणात ओम मुंडे याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविले गेले. यावेळी अमित आहुजा, ज्ञानेश्वर पाटील, अभंग जैन, कुणाल शहा, विमल जैन, प्रतिक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभा केला. चाळीसगाव संघाची सुरुवात तशी बेताचीच झाली होती. लोकेश पाटील (९ धावा) स्वस्तात बाद झाला तेव्हा धावफलकावर केवळ ३६ धावा होत्या. मात्र, त्यानंतर ओम मुंडे आणि साहिल गायकर या जोडीने मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. कर्णधार ओम मुंडेने ५६ चेंडूंत ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांसह ८५ धावांची खेळी करत संघाच्या डावाचा कणा मजबूत केला. त्याला साहिल गायकरने ७७ धावांची (४७ चेंडू, ९ चौकार, २ षटकार) झंझावाती साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला १६७ धावांच्या सुस्थितीत आणले.
गोलंदाजीमध्ये केवळ यश नहार आणि संदेश सुरवाडे यांनीच प्रतिस्पर्धी फलंदाजांना काहीसा लगाम घातला. यश नहारने आपल्या ४ षटकांत ६.५० च्या सरासरीने केवळ २६ धावा देत १ बळी टिपला. संदेश सुरवाडेने टिच्चून मारा करत केवळ २ षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात २ महत्त्वाचे बळी मिळवले.
 *प्रमुख गोलंदाजांची स्थिती:* 
धवल हेमनानी: ४ षटके, २६ धावा (किफायतशीर पण यश नाही)
कृष्णा माळी: ३ षटके, ३८ धावा (१२.६७ ची महागडी सरासरी)
आमिर खान: ४ षटके, ३३ धावा
मोहम्मद नोमान: २ षटके, २३ धावा
अखेरची षटके ठरली निर्णायक
डावाच्या उत्तरार्धात तौसिफ मिर्झा आणि अशफाक शेख या गोलंदाजांना आपल्या लय शोधता आली नाही. त्यांच्या अवघ्या काही चेंडूंवर फलंदाजांनी मोकळेपणाने हात साफ केले, ज्यामुळे चाळीसगाव संघाला १८० चा टप्पा ओलांडणे सोपे झाले.
रावेर रॉयल्सने चांगले प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु १० गडी गमावून १९.३ षटकात १७५ धावा काढून या सामन्यात हरले आणि सामन्याच्या बाहेर देखील झाले. यश नहार व तुषार चोरडिया यांची दमदार सुरवात झाली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाचे गोलंदाज अमेय कोळी, सरज पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर ओम मुंडे, वकार शेख, अभि पाटील आणि लोकेश पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 
 *जळगाव कोगटा किंग्सचा संघ विजयी* 
टी-२० जेसीएल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी रात्री झालेल्या एकतर्फी सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने आपला दबदबा निर्माण केला. सलामीवीर ओम भोसले आणि जितेंद्र नाईक यांच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोगटा किंग्सने १९६ धावांचा डोंगर उभा केला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना जामनेर सातपुडा हिरोजची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आणि संपूर्ण संघ अवघ्या ८५ धावांत तंबूत परतला.

 *भोसले-नाईक यांची शतकी भागीदारी* 

डॉ. राजेश पाटील आणि सीमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाणेफेक झाली. त्यात जामनेर सातपुडा हिरोज जिंकून जळगाव कोगटा किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. फलंदाजी स्वीकारलेल्या जळगाव कोगटा किंग्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर ओम भोसले याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत ३४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा कुटल्या. त्याला जितेंद्र नाईक याने संयमी साथ देत ४२ चेंडूत ६४ धावा जोडल्या. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
मध्य फळीत धावगती काहीशी मंदावली असली, तरी पुरवेश चौधरी (२३) आणि कर्णधार जगदीश झोपे (१७) यांनी मोक्याच्या क्षणी धावा काढल्या. जामनेरकडून ललित पाटीलने २७ धावांत ३ बळी घेत किंग्सला २०० धावांच्या आत रोखले. राम राठोडने २ तर अर्शद खानने १ गडी बाद केला.

 *जामनेरचा डाव पत्त्यासारखा कोसळला* 

१९७ धावांचे कठीण लक्ष्य समोर असताना जामनेर सातपुडा हिरोजची सुरुवात अत्यंत खराब झाली. ललित पाटील आणि राम राठोड हे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता बाद झाल्याने संघाची अवस्था १ धाव - २ बाद अशी केविलवाणी झाली. क्रीशी नाथानी (४) आणि मानस पाटील (२) हे देखील स्वस्तात माघारी परतले.
मधल्या फळीत मसूम खाटिकने २१ धावा आणि रामकृष्ण राठोडने १६ धावा करून थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने जामनेरचा डाव १९.४ षटकांत ८५ धावांवर आटोपला.

 *सागर भावरची भेदक गोलंदाजी* 

जळगाव कोगटा किंग्सच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. सागर भावरने टिच्चून मारा करत ४ षटकांत केवळ १२ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. त्याला राज बेलदार (२/२) आणि बिपिन चांगरे (२/४) यांनी अचूक साथ देत जामनेरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. उबेद खाटिक आणि मनीष चव्हाण यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
ओम भोसले याचा मॅन ऑफ द मॅच ने गौरविण्यात आले. यावेळी संघ मालक किरण बच्छाव, अतुल कोगटा, गौरव साफळे, ॲड. सूरज जहांगीर, हितेश मंडोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
 *थोडक्यात धावफलक:* 

जळगाव कोगटा किंग्स: २० षटकात १९६/८ (ओम भोसले ६४, जितेंद्र नाईक ६४; ललित पाटील ३/२७)
जामनेर सातपुडा हिरोज: १९.४ षटकात ८५/१० (मसूम खाटिक २१, रामकृष्ण राठोड १६; सागर भावर ३/१२, राज बेलदार २/२)

Wednesday, 22 April 2026

JCL 2-अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर विजयी*

*अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर विजयी*



जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच



*जळगाव दि.22 (प्रतिनिधी):* जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 मध्ये उपांत्यफेरीत पोहचण्याठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी रावेर रॉयल्स आणि पाचोरा एसकेटी योद्धाज यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रावेरचा संघ विजयी झाला. दुसऱ्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने दणदणीत विजय मिळवला. तत्पूर्वी २१ रोजी झालेल्या तिसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने विजय मिळवला. 
अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. अमळनेर संघाची सुरूवात दमदार झाली. सलामीच्या जोडीने ४९ धावांची भागेदारी केली. मानव टिबरेवाल याने ३९ तर ऋषी यादव याने १० धावा केल्या. मधल्या फळीत आलेल्या अजय पाटील याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यानंतर आलेले खेळाडू प्रभाव पाडू शकले नाही. परंतु सतीश चतुर्वेदी याने ११ चेंडूत २० धावा केल्या. त्यामुळे अमळनेर संघाची धावसंख्या आठ गडी गमावून निर्धारित २० षटकांत १४७ झाली. चाळीसगावकडून ओम मुंडे याने चार षटकांत केवळ १३ धावांत तीन महत्वाचे बळी टिपले. अमेय कोळी, कार्तिक बटुंगा, अभी पाटील, सूरज पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यानंतर अमळनेरच्या गोलंदजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्सचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. अपवाद फक्त ओम मुंडे याचा राहिला. त्याने ३२ धावा केल्या. चाळीसगावचा संपूर्ण संघ १६.३ षटकांत ८४ धावांवर बाद झाला. त्यामुळे अमळनेरचा ६३ धावांनी विजय झाला. चाळीसगाव संघाच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाद करणारा मोहम्मद सैफ सामनावीर ठरला. 

*रोमहर्षक सामन्यात रावेरचा पाहिला विजय*

पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या रावेर रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करत १९.२ षटकांत सर्व गडी गमावून १३० धावा केल्या. रावेरच्या संघात सलमावीर यश नहार याने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. आदित्य वाणी याने ११, तुषार चोरडियाने २०, मोहम्मद नमीन याने २७, धवल हेमानी याने १२, प्रज्वल राजपूत याने २२ धावांची खेळी केल्यामुळे रावेरचा संघ १०० पार जाऊ शकला. पाचोराकडून कैलास पांडे आणि विरेन पाटील यांनी २-२ तर सचिन चौधरी आणि निलेश पाटील यांनी एक-एक बळी घेतला. १३१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या पाचोरा संघ 19.3 षटकांत 123 धावांवर गारद झाला. त्यामुळे रावेरचा सात धावांनी विजय झाला. आर्यन देशमुखने अवघ्या 10 चेंडूत 24 धावांची आक्रमक खेळी करत डावाला वेग दिला, तर सिद्धेश देशमुख (22) आणि विरेंद्र पाटील (20) यांनी मधल्या फळीत योगदान दिले. पण त्यांची खेळी संघाला यश मिळवून देऊ शकली नाही. रावेरकडून यश नहार आणि मोहम्मद नोमान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धवल हेमदानी, अक्षय कोल्हे, कृष्णा माळी यांनी एक-एक बळी घेतला. तीन बळी, ३१ धावा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या यश नहार याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

*चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरचा दणदणीत विजय*
२१ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर संघाने पाचोरा एसकेटी योद्धाजवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला. नाणेफेक ॲडिशनल एसपी संदीपकुमार गावित व सामना अधिकारी विनीत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अभंग अजित जैन यांनी संदीपकुमार गावित यांचा सत्कार केला. प्रथम फलंदाजी करताना पाचोरा योद्धाजने २० षटकांत ९ गडी गमावून १०५ धावा केल्या. वीरेन पाटील (२९), रोहित तलरेजा (२५) आणि सचिन चौधरी (१४) धावांचे योगदान दिले. चाळीसगावकडून अभी पाटीलने ३ बळी घेतले, तर प्रणव जाधव व कोळी यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. १०६ धावांचे लक्ष्य चाळीसगाव संघाने केवळ १३.५ षटकांत पूर्ण केले. प्रशांत डोळे (३७), साहिल गायकर (२९) आणि कर्णधार ओम मुंडे (२४) यांनी दमदार फलंदाजी केली. यामुळे चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने सामना सहज जिंकला.

*आज क्वालीफायर ठरणार*
जेसीएलमधील साखळी फेरीचे आता दोन सामने बाकी आहे. त्यामुळे २३ एप्रिल रोजी क्वालीफायर ठरणार आहे. गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग सहा- सहा गुण घेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. 



*आजचे सामने (२३ एप्रिल)*
दुपारी ३ वाजता: रावेर रॉयल्स विरुद्ध X चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.
सायंकाळी ७.३० वाजता: पाचोरा एसकेटी योद्धाज X अमळनेर सुहांस जायंट्स.

*गुणतालिका*

संघ
सामने
विजयी
पराभूत
गुण
जामनेर सातपुडा हिरोज
4
3
1
6
जळगाव कोगटा किंग
4
3
1
6
अमळनेर सुहांस जायंट्स
4
2
2
4
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स
4
2
2
4
पाचोरा एसकेटी योद्धाज
4
1
3
2
रावेर रॉयल्स
4
1
3
2
रात्री ८ पर्यंत

Friday, 6 March 2026

करार पद्धतीने अधिवक्ता नियुक्तीबाबत..

करार पद्धतीने अधिवक्ता नियुक्तीबाबत..


मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठी अधिवक्ता या पदासाठी ३ वर्षाच्या कालावधीसाठी करार पध्दतीने मार्गदर्शन सुचनेनुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालय छ. ९ संभाजीनगर, जालना, बीड, सातारा, पुणे, अमरावती, हिंगोली, बुलढाणा, परभणी, यवतमाळ, अकोला, वाशिम, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव यां जिल्हा स्तरावर अधिवक्ता नियुक्त करून परिश्रमिक (मोबदला) निश्चित करण्यात येईल. महामंडळाच्या कर्ज वसुली अंतर्गत १३८-निगोशिएबल इंस्ट्रुमेंट अॅक्ट अंतर्गत वेळोवेळी नोटीसा बजावून खटले मा. न्यायालयामध्ये दाखल करणे.इ. कामे पार पाडणे आवश्यक आहे. प्रशासन, वित्त व लेखा विषयक कामकाजाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास अधिवक्ता या पदासाठी प्राधान्य देण्यात येईल. सदर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. २०/०३/२०२६ पर्यंत पोस्टाने आवश्यक त्या कागदपत्रांसोबत महामंडळाच्या मुख्यालयास पाठविण्यात यावेत.

पत्ता: मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, डी.डी. बिल्डींग, दुसरा मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ या पत्त्यावर पाठविण्यात यावेत.

Tuesday, 10 February 2026

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी,जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण..








(इंडिया 365 न्युज, अयाज मोहसीन)
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी*
*जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण*


जळगाव दि. १०  (प्रतिनिधी) - जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते जैन हिल्स येथील केळीच्या बनात करण्यात आले. या सोहळ्याला जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा वारसा भक्कमपणे पुढे नेणाऱ्या जैन परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. तसेच जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि सहकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नव्याने विकसीत केलेल्या जाती ‘जैन मॅडरिन-१’ ही जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड (JISL) यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले एक आधुनिक आणि उत्पन्नक्षम संत्र्याचे नवीन वाण आहे. पारंपरिक संत्र्याच्या तुलनेत ही जात लवकर फळधारणा होत असलेली आहे. या वाणामुळे कमी कालावधीत बाजारात येणारा दर्जेदार माल मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची संधी वाढते. विशेष म्हणजे दुसऱ्याच वर्षापासून झाडांना फळधारणा सुरू होते, त्यामुळे संत्रा बाग गुंतवणुकीवर लवकर परतावा मिळतो.
या संत्र्याची चव ही नागपूर संत्र्यापेक्षा अधिक गोड असून फळांचा रंग आकर्षक, गडद आणि लालसर केशरी (reddish orange) असतो. फळांचा आकार, सोलण्याची सुलभता आणि रसाळपणा यामुळे ‘जैन मॅडरिन-१’ हा टेबल पर्पज म्हणजेच थेट खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असे दर्जेदार फळ मिळत असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेसोबतच निर्यातीसाठीही ही जात आशादायक ठरू शकते असा विश्वास कंपनीचे लिंबू वर्गिय फळांचे संशोधक डॉ. मिलींद लदानिया यांनी सांगितले.
उत्पादनाच्या दृष्टीने ही जात भरघोस उत्पादन देणारी आहे. या जातीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलधारणा करण्यासाठी पाण्याचा ताण (water stress) देण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे पाणी व्यवस्थापन अत्यंत सुलभ होते. कमी पाण्यातही स्थिर उत्पादन देणारी ‘जैन मॅडरिन-१’ ही जात बदलत्या हवामानात आणि मर्यादित संसाधनांमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.

फोटो मधे नव्याने विकसीत केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या वाणाचे लोकार्पण करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि सौ. ज्योती जैन, शेजारी कल्याणी नागुलकर, सौ. शोभना जैन, अजित जैन, डॉ. भावना जैन, सौ निशा व अनिल जैन डॉ. बी.के. यादव..

Sunday, 25 January 2026

इकरा महाविद्यालय _77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण संपन्न*

*77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण निमित्त कार्यक्रम आयोजन*
         दिनांक 26/01/2026 रोजी  77 व्या प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते ध्वजारोहण इकरा एज्युकेश्नल कॉम्प्लेक्स, शिरसोली रोड येथे करण्यात आले. या वेळी त्यांनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना 77 व्या प्रजासत्ताकदिनाचे शुभेच्छा दिल्या. या मध्ये इकरा युनानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस,  उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, इकरा बी.एड. कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर इरफान शेख, इकरा डिएड कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर सईदा वकील, इकरा पब्लिक स्कुलचे मुख्यध्यापक शकिल शेख,   तसेच सर्व महाविद्यालयाचे शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी , हॉस्पिटल स्टाफ़, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. या निमित्त सोसायटीचे अध्यक्ष यांनी प्रजा सत्ताकदिनाचे महत्व व त्याची कार्य पद्धती आपल्या देशात कशा प्रकारे करण्यात येते व त्याची अमलबजावणी या बाबत आपले मनोगत व्यक्त केले. आणि साक्षरता शपथ सर्व विद्यार्थी, विद्यार्तीनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देण्यात आली.

Wednesday, 14 January 2026

प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार - ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांचा इशारा

*प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार - ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांचा इशारा*

जळगाव: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी, प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

*नेमके प्रकरण काय?*
नुकतीच निवडणूक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे समोर आले होते. या यादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळा असणे, प्रभागात राहत नसतानाही नावे नोंदवणे आणि संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करणे असे प्रकार उघडकीस आले होते.

ॲड. पियूष पाटील यांचा आक्रमक पवित्रा
या संदर्भात बोलताना ॲड. पियूष पाटील यांनी थेट आरोप केला आहे की, निवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक बोगस मतदारांची मोठी फौज उभी केली गेली आहे. त्यांनी म्हटले की:
> "एकाच मतदाराचे नाव वेगवेगळ्या प्रभागात असणे किंवा एकाच पत्त्यावर अनेक अनोळखी व्यक्तींची नावे असणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. आम्ही या सर्व नावांची सखोल पडताळणी केली असून, पुराव्यांसह प्रशासनाकडे तक्रार दिली आहे. जे लोक बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील."

*प्रशासनाकडे तक्रार दाखल*
प्रभाग क्रमांक ५ मधील या बोगस मतदार प्रकरणाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. यामध्ये खालील 

*मागण्या करण्यात आल्या आहेत:*
 * दुबार नावांची तात्काळ छाटणी करावी.
 * संशयास्पद मतदार नोंदणीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी.
 * बोगसगिरी करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करावेत.

Sunday, 28 December 2025

हेतल पाटिल यांचे 6 मध्ये तगड़े आवाहन...

जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती-महाआघाडीने प्रत्येक प्रभागात विजयी चेहरा देणे आवश्यक झाले आहे.

 अशात प्रभाग क्रमांक ६ मध्ये हेतल महेंद्र पाटील यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

अनेक इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया संपली असली तरी अंतिम यादी जाहीर व्हायची आहे.

 मात्र, हेतल पाटील यांची उमेदवारी नक्कीच विजयाची हमी ठरेल, असा मतदार व कार्यकर्त्यांचा कौल आहे.


स्थानिक आणि उच्चशिक्षित महिला नेतृत्व

B.E. आणि MSW पदवीधारक असलेल्या हेतल पाटील या समस्यांवर प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

● दिव्यांग, महिलांचे प्रश्न

● आरोग्य सेवा उपक्रम

● गरजू नागरिकांसाठी तत्पर मदत

त्यांचे वडील महेंद्र पाटील व संपूर्ण कुटुंब सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असून लेवा पाटील समाजातील त्यांचा प्रभाव निर्णायक आहे.


पत्रकार पतीची जनसंपर्कातील मजबुती

हेतल पाटील यांचे पती चेतन रविंद्र वाणी हे 15 वर्षांपासून क्राईम रिपोर्टिंगमध्ये कार्यरत.

शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन व समाजघटकांमध्ये त्यांचा मजबूत संपर्क असून याचा थेट फायदा रणनितीत मिळणार आहे.


प्रभाग ६ मधील जनतेचा स्पष्ट संदेश

छत्रपती शाहू नगर, दत्त कॉलनी हा हेतल पाटील यांचा मूळ परिसर. टागोर नगर, दंगलग्रस्त कॉलनी येथे महिलांचा मोठा विश्वास त्यांच्या बाजूने उभा आहे.

मतदारांची मागणीही स्पष्ट —

➡️ बाहेरून लादलेला नव्हे…

➡️ स्थानिक आणि कामातून सिद्ध झालेली महिला हवी!

ही अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद केवळ हेतल पाटील यांच्यात दिसते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेतल पाटिल यांचे 6 मध्ये तगड़े आवाहन...

जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती-महाआघाडीने प्रत्येक प्रभागात विजयी चेहरा देणे आवश्यक झाले आहे.

 अशात प्रभाग क्रमांक ६ मध्ये हेतल महेंद्र पाटील यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

अनेक इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया संपली असली तरी अंतिम यादी जाहीर व्हायची आहे.

 मात्र, हेतल पाटील यांची उमेदवारी नक्कीच विजयाची हमी ठरेल, असा मतदार व कार्यकर्त्यांचा कौल आहे.


स्थानिक आणि उच्चशिक्षित महिला नेतृत्व

B.E. आणि MSW पदवीधारक असलेल्या हेतल पाटील या समस्यांवर प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

● दिव्यांग, महिलांचे प्रश्न

● आरोग्य सेवा उपक्रम

● गरजू नागरिकांसाठी तत्पर मदत

त्यांचे वडील महेंद्र पाटील व संपूर्ण कुटुंब सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असून लेवा पाटील समाजातील त्यांचा प्रभाव निर्णायक आहे.


पत्रकार पतीची जनसंपर्कातील मजबुती

हेतल पाटील यांचे पती चेतन रविंद्र वाणी हे 15 वर्षांपासून क्राईम रिपोर्टिंगमध्ये कार्यरत.

शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन व समाजघटकांमध्ये त्यांचा मजबूत संपर्क असून याचा थेट फायदा रणनितीत मिळणार आहे.


प्रभाग ६ मधील जनतेचा स्पष्ट संदेश

छत्रपती शाहू नगर, दत्त कॉलनी हा हेतल पाटील यांचा मूळ परिसर. टागोर नगर, दंगलग्रस्त कॉलनी येथे महिलांचा मोठा विश्वास त्यांच्या बाजूने उभा आहे.

मतदारांची मागणीही स्पष्ट —

➡️ बाहेरून लादलेला नव्हे…

➡️ स्थानिक आणि कामातून सिद्ध झालेली महिला हवी!

ही अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद केवळ हेतल पाटील यांच्यात दिसते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Monday, 15 December 2025

पोलिस ने पकडा कालिया बंदर


दि.१३/१२/२०२५ रोजी फियांदी शरीफ मुराद खाटिक, रा. सुप्रिम कॉलनी जळगांव हे चाळीसगांव येथे लग्न समारंभाकरीता गेले असता त्यांचे राहते घराचे कडी कोंडा तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ४९६००/- रु. चा मुद्देमाल चोरुन नेल्या बाबत तक्रार दिल्याने एमआयडीसी पो. स्टे येथे अज्ञात इसमाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची घरफोडी ही अभिलेखावरील गुन्हेगार १) शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर रा. कासमवाडी जळगांव २) साहिल शहा सदाम शहा ऊर्फ काल्या रा. तांबापुरा जळगांव यांनी केली असल्याबाबतची माहिती मा. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना मिळाली होती, त्याप्रमाणे कासमावडी परिसरातून नमुद आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. म्हणून नमुद आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी एमआयडीसी पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. चे पोहेकों/किरण चौधरी हे करीत आहेत, नमुद दोन्ही आरोपी मजकुर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा, श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, मा. श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि, शरद बागल, सफी/अतुल बंजारी, पोहेकों/अक्रम शेख, विजय पाटील, पोना/किशोर पाटील, पोकों/राहुल रगडे, रविंद्र कापडण, गोपाल पाटील सर्व स्थागुशा जळगांव यांनी केली आहे.

Saturday, 29 November 2025

*वरणगाव येथे या मंगळवारी आठवडे बाजार नाही.जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी* *आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

*वरणगाव येथे या मंगळवारी  आठवडे बाजार नाही.जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी* 
*आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी* 


*जळगाव, दि. 28 नोव्हेंबर (इंडिया 365 न्यूज) :–* नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला असून आदर्श आचारसंहिताही त्याच दिवसापासून लागू आहे. निवडणुकीचे मतदान मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मंगळवार व बुधवार या दिवशी अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नये म्हणुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँण्ड फेअर्स अॅक्ट 1862 च्या कलम 5 (अ) व (क) मधील अधिकारांचा वापर करून महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. 

त्यानुसार 02 डिसेंबर 2025 (मतदानाचा दिवस) आणि 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) या दोन्ही दिवशी जळगाव जिल्ह्यातील नगर पालिका हद्दींमध्ये भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात येतील.तसेच नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Tuesday, 18 November 2025

*जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भाजपा ची बिनविरोध बोहनी*

*जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात कमळ फुलण्यास सुरुवात...*

नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या पत्नी सौ.उज्वला दीपक तायडे यांची प्रभाग क्रमांक ११ ब मधून बिनविरोध निवड झाली.


जामनेर नगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ.उज्वला दीपक तायडे यांचा विरोधातील उमेदवार यांचा अर्ज छाननी मध्ये फॉर्म बाद करण्यात आला. त्यामुळे उज्वला दीपक तायडे ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ह्या निवडीमुळे जामनेर शहरात भाजपाचे कमळ फुलण्यास सुरुवात झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीचे ना . गिरीषभाऊ महाजन, नगराध्यक्ष साधना ताई महाजन, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व भाजप पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Wednesday, 5 November 2025

*सर्वात मोठा "पंच"....*


*विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे  प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती* 

*जळगाव दि.५ प्रतिनिधी* -  जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत  विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन  दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा होईल. या जागतिक बुद्धिबळपटूंसाठी आकर्षण केंद्र असलेल्या स्पर्धेत जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांना (सामना पंच) सहाय्यक पंच म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) यांनी केली आहे. प्रवीण ठाकरे यांनी यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. विश्वचषक स्पर्धेत असा बहुमान मिळवणारे उत्तर महाराष्ट्रातील प्रविण ठाकरे पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ संघाचे सल्लागार तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विशेष कौतूक करून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, नरेंद्र फिरोदिया, विनय बेले, पी. बी. भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ महासंग्रामात ८० पेक्षा जास्त देशांचा सहभाग असून, २०६ खेळाडू अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या गटातील या स्पर्धेत बाद फेरीचा अवलंब केला जात असल्याने अतिशय उत्कंठावर्धक व रोमहर्षक सामने अनुभवण्याची संधी बुद्धिबळ प्रेमींना लाभत असते. भारताकडून डी गुकेश, प्रग्नानंदा, अर्जुन इरिगेसी, विदित गुजराथी, अरविंद चिदंबरम,  दिव्या देशमुख सारखे कसलेले खेळाडू सहभागी होत असून जगभरातून अनिश गिरी, वेस्ली सो, नोदरबेक अब्दुसत्तारोव,इयान नेपोमियाशी, व्हिन्सेंट केमर, लियोन आरोनियन यांसारखे दिग्गज व अनुभवी खेळाडू  देखील या स्पर्धेत आपले कसब पणाला लावतील.

जगातील सर्वोत्तम २०६ बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व नियुक्त केलेले पंच या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व गोवा शासनाने केली आहे. या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्तीस हा बहुमान प्राप्त व्हावा, ही महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेमींसाठी खचितच अभिमानास्पद बाब आहे.  
या त्यांच्या यशासाठी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*फोटो कॅप्शन* -  प्रविण ठाकरे यांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्त झाल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना अशोक जैन, अतुल जैन.

Thursday, 30 October 2025

जानिए मदरसे को 10 लाख की सबसिडी कैसे मिलाए?

डॉ. जाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना 2025-26 के तहत मदरसों से आवेदन आमंत्रित। रिपोर्ट अयाज़ मोहसिन, इंडिया 365 न्यूज.जलगांव, दिनांक 30 अक्टूबर 2025।

जिन मदरसों में पारंपरिक धार्मिक शिक्षा के साथ-साथ विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, अंग्रेजी और उर्दू जैसे विषयों की आधुनिक शिक्षा दी जाती है, उनसे डॉ. जाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना वर्ष 2025-26 के तहत आवेदन मांगे गए हैं।
इस योजना के अंतर्गत आधुनिक शिक्षा के लिए बुनियादी ढांचा (इंफ्रास्ट्रक्चर) तैयार करने हेतु 10 लाख रुपये तक का अनुदान स्वीकृत किया जा सकता है। संबंधित मदरसा या संस्थान का धर्मदाय आयुक्त कार्यालय अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड के पास पंजीकृत होना आवश्यक है।शासन के निर्णय दिनांक 21 अगस्त 2024 के अनुसार, इस योजना के तहत बुनियादी सुविधाओं में वृद्धि की गई है। इच्छुक मदरसे निर्धारित प्रारूप में आवेदन जिला नियोजन अधिकारी, जिला कलेक्टर कार्यालय, जलगांव के पास 14 नवंबर 2025 तक जमा करें। निर्धारित समय सीमा के बाद प्राप्त आवेदनों पर विचार नहीं किया जाएगा। आवेदन पत्र का प्रारूप और आवश्यक दस्तावेजों की सूची www.maharashtra.gov.in वेबसाइट पर उपलब्ध है।यह जानकारी जिला नियोजन अधिकारी विजय शिंदे ने एक प्रेस विज्ञप्ति के माध्यम से दी है।

*मुरलीधर चौधरी "माऊली" यांची भाजपा तिर्थक्षेत्र चिटणीसपदी निवड, सुनिल भाऊ भंगाळे यांनी केले अभिनंदन...*

*भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची “तीर्थ क्षेत्र विकास आघाडी “ जिल्हा कार्यकारिणी २०२५  जाहीर*

*मुरलीधर चौधरी "माऊली" यांची चिटणीसपदी निवड, सुनिल भाऊ भंगाळे यांनी केले अभिनंदन...*

            आज *दिनांक :- २९/१०/२०२५ रोजी*  मुख्यमंत्री *मा. ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.आ.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब* (भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांच्या आदेशाने, *मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन* (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), *मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे* (केंद्रीय राज्यमंत्री), *मा.ना.श्री.संजयभाऊ सावकारे*  (वस्त्रोद्योग मंत्री) यांच्या नेतृत्वात, *मा.श्री. विजय चौधरी* (प्रदेश महामंत्री), *मा.श्री. रविजी अनासपुरे* (विभागीय संघटन मंत्री), *मा.श्रीमती स्मिताताई वाघ* (खासदार), *मा.श्री.सुरेश भोळे*  (आमदार), *मा.श्री. मंगेशदादा चव्हाण*  (आमदार), *मा.श्री. अमोल जावळे* (आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली *जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री.डॉ. राधेश्याम चौधरी* यांच्या मान्यतेनुसार *तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे  जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भगवान बाविस्कर* , भाजपा जळगाव पश्चिम जिल्हा तीर्थ क्षेत्र विकास आघाडी-  *जिल्हा कार्यकारिणी - २०२५  जाहीर*

#Radheshyam Chaudhari
BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)
Girish Mahajan
Ravindra Chavan
Devendra Fadnavis
J.P.Nadda